vishnu

श्रीविष्णूची कहाणी

काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला….

पुढे वाचा
Lokmany Tilak

शेंगांची टरफले ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )

लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली हि प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या. त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटुन खाल्ल्या. टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती. ह्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. शेंगा काढल्या कि त्यांनी टरफले वाट्टेल तिथे टाकल्या. बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफले पडली.  मधली सुट्टी संपल्यावर…

पुढे वाचा

महालक्ष्मीची कहाणी(The story of Mahalakshmi)

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी.  त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला.  एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले. त्याच नगरात…

पुढे वाचा

गंपूची शाळा

एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप चपळ, चलाख आणि हसतमुख होता. पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती. रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं. गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूपच आश्चर्य वाटायचं. ते त्याला शाळेत का जायचं…

पुढे वाचा
budbud ghagri

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ…

पुढे वाचा
ab

समुद्राचे लग्न

एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला.  असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे, दरबारातले प्रश्न चुटकीसरशी सोडवत नसे, आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबलाएवढी मजा येत…

पुढे वाचा

📜 “धर्मवीर रामाचा वनवास”

एकदा अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण होते. राजा दशरथ आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला राजा बनवण्याची तयारी करत होते. संपूर्ण नगर दीपांनी उजळले होते. परंतु नियती काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. कैकेयी, दशरथाची पत्नी, तिच्या दोन वरांच्या स्मरणाने व्याकुळ झाली. तिने रामाला चौदा वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य देण्याची मागणी केली. राजा दशरथ दुःखाने कोसळले. रामाने मात्र…

पुढे वाचा

खरं सुख

गावाच्या एका टोकाला, मोठ्या झाडांच्या सावलीत एक लहानशी झोपडी होती. तिथं रामू आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचं आयुष्य फारच साधं होतं. रोज पहाटे तो उठायचा, थोडं दूध काढायचं, शेतात जायचं, आणि संध्याकाळी घरी येऊन कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा. त्याला फारसे पैसे नसायचे, पण चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचं. रामूला गरजेनुसार जे मिळे तेवढ्यात तो खूश राहत असे….

पुढे वाचा
Undirachi topi

उंदराची टोपी 

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.  उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो…

पुढे वाचा