श्रीविष्णूची कहाणी
काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला….