महालक्ष्मीची कहाणी(The story of Mahalakshmi)

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी.  त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला.  एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले. त्याच नगरात…

पुढे वाचा

खोडकर मेंढपाळ

एका खेड्यात एक छोटा मेंढपाळ राहत होता. त्याला मजा करायला खूप आवडायचे. एके दिवशी त्याला गावकऱ्यांना फसवायची कल्पना सुचली. तो ओरडला, “सिंह आला! सिंह आला! माझ्या मेंढ्या खाण्यासाठी आला आहे!” गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी धावत आले. पण त्यांनी पाहिले की तिथे सिंह नव्हता. मेंढपाळ मोठ्याने हसत म्हणाला, “मी फक्त मजा करत होतो!” गावकऱ्यांना…

पुढे वाचा

वाईट संगतीचे परिणाम

एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्‍याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले…

पुढे वाचा

शेतकरी मुलाचा डिजिटल यशाचा प्रवास

“नेट नसताना सुरू झाला ऑनलाइन व्यवसाय…” साताऱ्याजवळच्या एका लहानशा गावात राहणारा विवेक जगदाळे हा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. वडिलांच्या शेतीमध्ये मदत करणं, गुरं ढोर सांभाळणं, हाच त्याचा रोजचा दिनक्रम. शिक्षण बारावीपर्यंत झालं, पण नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती परवडत नव्हती. एक दिवस गावात एक युवक स्मार्टफोन घेऊन आला. त्याने सांगितलं की तो मोबाईलवरून…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

कावळ्याची युक्ती

एका जंगलात एक कावळा राहत होता. त्याला खूप तहान लागली होती, पण त्याला कुठेही पाणी दिसत नव्हते. तो उडत उडत एका गावाला पोहोचला. तिथे त्याला एक मातीचं मोठं भांडं दिसलं. कावळा त्या भांड्याजवळ गेला आणि त्याने पाहिलं, तर त्यात थोडंसं पाणी होतं, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळा निराश झाला, पण त्याने हार मानली…

पुढे वाचा

एका डोळ्याची आई

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो….

पुढे वाचा

चमचम गोष्ट

एक होती परी. तिचं नाव जरू. जरूचा एक मित्र होता, त्याचं नाव हिमान. जरू जशी परी होती तसा हिमान परा होता. त्यांची गंतच चालायची. दोघं आपल्या रंगीबेरंगी पंखांनी उड उड उडायचे. खेळायचे. वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे. त्यांच्यावर बसायचे. त्यांच्याशी स्पर्धा सुद्धा खेळायचे. पाऊस भरलेल्या ढगांध्ये गेल्यावर मज्जा यायची. त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि…

पुढे वाचा

“आजीची बाग”

कोकणातल्या एका हिरवळीने भरलेल्या गावात जानकी आजी राहायची. वय अंदाजे सत्तरच्या घरात, पण उत्साह मात्र एखाद्या शाळकरी मुलीसारखा! तिचं आयुष्य शेतात गेलेलं – रान, झाडं, फुलं, फळं आणि मातीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळलेला. पण काही वर्षांपूर्वी तिचा नातू शरद शहरात गेला आणि आजीचं घर थोडं सुन्न झालं. एकटी झाल्यावर सुरुवातीला ती खूप खचली होती. पण…

पुढे वाचा

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. अचानक…

पुढे वाचा