दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा
मोबाईलचा वापर – वरदान की शाप?

मोबाईलचा वापर – वरदान की शाप?

मोहन नावाचा एक हुशार, स्मार्ट आणि उत्साही मुलगा होता. वयाने चौदा, पण त्याचं जग मोबाईलभोवती फिरायचं. पहाटे उठल्यावर पहिलं काम — इन्स्टाग्राम. अभ्यासाच्या तासातही मेंदूत रील्स आणि गेम्स. रात्री झोपतानासुद्धा शेवटचा मेसेज बघितल्याशिवाय झोप लागत नसे. एकेकाळी शाळेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये असणारा मोहन, आता मागे पडू लागला होता. आई-वडिलांचं बोलणं त्याचं मनाला भिडत नव्हतं. मित्र…

पुढे वाचा

पाखराचं स्वप्न

एका गावात एक लहानसं पाखरू राहत होतं. त्याचं नाव होतं “गुगू”. गुगू लहान असलं तरी त्याची स्वप्नं खूप मोठी होती. त्याला आकाशाच्या पलीकडे उडायचं होतं, उंच उंच ढगांमध्ये. पण त्याच्या मित्रांना वाटायचं की गुगूचं स्वप्न अशक्य आहे. एके दिवशी गुगूने आपल्या आईला सांगितलं,“आई, मी एक दिवस एवढं उडणार की सूर्यालाही स्पर्श करेन!” आई हसली आणि…

पुढे वाचा
Badbade kasav

बडबडे कासव

एक कासव होते. ते फारच बडबडे होते. पाण्यात असो कि पाण्याबाहेर, ते सतत इतरांशी गप्पा मारण्यात मग्न असे. त्याची एकदा दोन पक्ष्यांशी मैत्री झाली. त्यांच्याशीही कासव भरपूर गप्पा मारत असे. त्याने त्या पक्ष्यांना मला कधी तुमच्यासोबत उडायला घेऊन चला असा आग्रह केला. पण कासव कसे उडणार? म्हणुन ते पक्षी काही तयार होत नसत.  कासवाने मात्र अनेक दिवस आपला आग्रह चालुच…

पुढे वाचा

समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण! गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी. त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थरामदासस्वामींनी अंबाजी ला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुरुआज्ञा प्रमाण मानून कुर्‍हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात…

पुढे वाचा

सावळ्या गाढवाचं सोनं

एका खेड्यात एक शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं – गंगाराम. गंगाराम फार साधा आणि मेहनती माणूस होता. त्याच्याकडे एक सावळं गाढव होतं, नाव – भोंड्या. भोंड्या रोज शेतात ओझं वाहायचं, पाण्याच्या हंड्यांमध्ये फिरायचं, आणि संध्याकाळी दमून दमून घरी यायचं. पण गावातले लोक भोंड्याची सतत चेष्टा करायचे. “अरे, हे काय गाढव आहे? काळं-कुळिश! कुणी सोनं…

पुढे वाचा

शहाणपणाचं उत्तर

खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका मोठ्या राज्याचा राजा होता – चांगला, शहाणा आणि न्यायप्रिय. पण त्याला एक सवय होती – तो अनेकदा अशा प्रश्नांची कोडी विचारायचा, ज्यांची उत्तरं सहज देता येत नसत. जे योग्य उत्तर देईल, त्याला बक्षीस दिलं जात असे.एकदा त्याने दरबारात एक विचित्र प्रश्न विचारला:“संपूर्ण राज्यात सर्वात मोठं सत्य आणि सर्वात मोठं खोटं…

पुढे वाचा
doctor

खरा वेडा कोण – (Khara Veda Kon)

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे.त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज…

पुढे वाचा
Chindhi

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना…

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा