
दिसुनही न पाहणारे
एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?” बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी केली नाही, पण माझ्या मते जगात आंधळी माणसंच जास्त असतील.” अकबराचे समाधान झाले नाही. “बिरबल, जर गणना केलीच नाही तर तू कशाच्या आधारे हे सांगतो आहेस?…