सिंधुताई सपकाळ: अनाथांची माय

सिंधुताई सपकाळ या एक महान समाजसेविका होत्या, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार, आणि वंचित मुलांसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन हे प्रेरणा देणारे असून, त्यांचा संघर्ष आणि समाजकार्य आपल्याला सहानुभूती, सेवाभाव, आणि धैर्य शिकवते. त्या एक समर्पित समाजसुधारक, कार्यकर्त्या आणि स्त्रीसशक्तिकरणाच्या क्षेत्रातल्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी, अशा स्थितीत असलेल्या महिलांसाठी आणि अनाथांसाठी कार्य केले…

पुढे वाचा
Sant

दोन संतांची तीर्थयात्रा

ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपूरातून तीर्थयात्रा सुरु केली. भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेटी देणे सुरु केले. काही ठिकाणी ह्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत….

पुढे वाचा

“शून्यातून शिखराकडे”

राजेश गावातल्या एका लहानशा कुटुंबात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात फार काही नव्हतं—ना पैशाचं सुख, ना मोठं घर, ना शाळेसाठी महागडं साहित्य. पण एक गोष्ट होती—स्वप्न. राजेशच्या डोळ्यात शिक्षणाचं, यशाचं आणि कष्टाने आयुष्य घडवण्याचं स्वप्न होतं. शाळा गावीच होती. दररोज चार किलोमीटर चालत तो शाळेत जात असे. त्याच्याकडे वह्या कमी, पण चिकाटी प्रचंड होती. शाळेत तो…

पुढे वाचा

ऐतिहासिक गाथा: राजमाता जिजाऊंचा त्याग आणि संस्कार

राजमाता जिजाऊ यांचा जन्म इ.स. १५९८ मध्ये सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे मराठा सरदार होते. जिजाऊ लहानपणापासूनच शौर्य, धर्मभावना आणि न्यायप्रियतेच्या संस्कारात वाढल्या. त्यांचं बालपण युद्धकला, शास्त्र, धार्मिक अभ्यास, आणि राजकारण यांचा गाढ परिचय घेत घडलं. त्या स्वतःमध्ये एक शिक्षिका, सैनिक, आणि द्रष्ट्या स्त्री होत्या. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी…

पुढे वाचा

ध्रुव एक तारा

प्राचीन काळी उत्तर पदेशात उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याच्या दोन राण्या होत्या — सुरूची आणि सुनिती. सुरूची ही राजाची लाडकी राणी होती, त्यामुळे राजा तिच्यावर अधिक प्रेम करायचा. सुनिती ही शांत, सुशील पण दुर्लक्षित राणी होती. तिच्या पोटी ध्रुव नावाचा एक मुलगा झाला होता. एक दिवस ध्रुव बाळ राजवाड्यात खेळत असताना त्याला आपल्या वडिलांच्या…

पुढे वाचा
cinderella

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले सगळे…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड गोष्ट

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा
Nyay

खरा न्याय – (Khara Nyay)

एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो. रमेशच्या मदतीमुळे सुरेशला…

पुढे वाचा

प्रामाणिक रघूची भेट

एक होता रघू. तो एका लहानशा खेडेगावात आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे वडील शेतकरी होते आणि रघूला लहानपणापासून मेहनतीची व प्रामाणिकपणाची शिकवण मिळाली होती. तो रोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा, आईला घरकामात मदत करायचा, आणि वडिलांसोबत शेतातही जात असे. रघूचा स्वभाव फारच सरळ आणि सच्चा होता. त्याला खोटं बोलायला अजिबात आवडत नसे. मित्रांमध्येही तो नेहमी इमानेइतबारे…

पुढे वाचा

चपातीची वाटणी

दोन भुकेल्या मांजरी होत्या. एके दिवशी त्यांना एक चपातीचा तुकडा मिळाला. दोघी त्या तुकड्यावर आपापला हक्क सांगू लागल्या. एका मांजरीने तो तुकडा उचलला. दुसरी मांजर म्हणाली, “चल मिळुन वाटून खाऊया.” पहिली मांजर चतुर होती. तिला एकटीलाच पूर्ण चपाती खायची होती. तिने दुसऱ्या मांजरीला साफ नकार दिला. दोघींमध्ये भांडण झाले. त्याच वेळी तिथून एक माकड जात…

पुढे वाचा