कृती आधी उपदेश नंतर

एक मुलगा तलावात पोहायला गेला. त्याला नुकताच पोहायला शिकला होता, त्याला पोहण्याचा फार काही अनुभव नव्हता.  पोहता पोहता तो तलावात जरा आत गेला जिथे खोली जास्तच होती. त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो फार घाबरला आणि हातपाय मारायला लागला. पण भीतीमुळे त्याला नीट पोहता येईना. तो ओरडायला लागला. एक वाटसरू तिथुन जात होता. त्या मुलाने…

पुढे वाचा

कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता.  थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले…

पुढे वाचा

चांद्रयान-३’चा अभिमान

‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत,  पद्मश्री (१९९८),  पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर!   ‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ…

पुढे वाचा
Aambe

स्वस्तातले आंबे

लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते. फिरून परत होता होता दिवस मावळायला आला. परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माणुस भेटला. संध्याकाळ झाल्यामुळे तो आपलं सामान आवरून घरी निघत होता. त्या दोघांना आंबे पाहुन ते खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आंब्याच्या दराची चौकशी केली. म्हातारा म्हणाला “पोरांनो, आता संध्याकाळ झालीये. बाजार संपला त्यामुळे…

पुढे वाचा

खारीचा वाटा

सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती.  ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले. आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पुल/ ब्रिज) बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे मोठे दगड आणुन त्यावर…

पुढे वाचा

साप आणि कावळे

एका गावाजवळ वडाचे एक मोठे झाड होते. कावळ्यांच्या एका जोडीने तेथे आपले घरटे बनवले. नवरा-बायको त्यामध्ये आनंदाने राहू लागले. घरट्यात त्यांनी अंडी घातली. काही दिवसांनी त्यांच्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली. परंतु कावळ्यांना हे माहीत नव्हतं की, लवकरच त्यांच्या सुखी जीवनामध्ये एक खूप मोठे संकट येणार आहे. त्या झाडाच्या ढोलीमध्ये एक मोठा साप राहत होता. तो…

पुढे वाचा

जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड

एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता.  शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा…

पुढे वाचा

सरखेल कान्होजी: समुद्राचा अजिंक्य राजा

सतराव्या शतकाच्या अखेरीस, भारताची पश्चिम किनारपट्टी परकीय सत्तांच्या लालसेचे केंद्र बनली होती. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच व्यापारी कंपन्या केवळ व्यापारासाठी नव्हे, तर समुद्रावर आणि जमिनीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होत्या. समुद्रावर त्यांचीच हुकूमत चालायची. अशा काळात, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला एक मराठा योद्धा समुद्राचा राजा म्हणून उदयास आला, ज्याने युरोपीय सत्तांना सलग चाळीस…

पुढे वाचा

जादुई पुस्तक

एका लहान गावात, अर्जुन नावाचा एक गरीब मुलगा राहायचा. त्याला पुस्तके वाचायला खूप आवडायचे, पण त्याच्याकडे पुस्तके विकत घ्यायला पैसे नसायचे. तो नेहमी गावच्या लायब्ररीच्या बाहेर उभा राहून आतल्या पुस्तकांकडे मोठ्या आशेने बघत असे. एक दिवस, लायब्ररी बंद झाल्यावर त्याला तिथे एक जुने, धूळ भरलेले पुस्तक पडलेले दिसले. त्याचे सोनेरी रंग आणि त्यावरची रहस्यमय चित्रे…

पुढे वाचा
Manjar

दृष्ट मांजर

जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती.पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते. मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत…

पुढे वाचा