समुद्राचे लग्न
एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला. असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे, दरबारातले प्रश्न चुटकीसरशी सोडवत नसे, आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबलाएवढी मजा येत…