Kolha Ani draksh

द्राक्षे आणि कोल्हा

एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते. शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो,…

पुढे वाचा
Ahankari

अहंकारी राजाला अद्दल

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक…

पुढे वाचा

प्रतापगडाची लढाई: शिवाजी महाराज विरुद्ध अफझल खान

प्रतापगडाची लढाई ही मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक निर्णायक घटना आहे. अफझल खान हा बीजापूरचा एक प्रभावी सेनापती होता, जो शिवाजी महाराजांना पराभूत करून स्वराज्य संपवण्याच्या हेतूने निघाला होता. परंतु, शिवाजी महाराजांच्या चातुर्याने व शौर्याने ही लढाई मराठ्यांच्या विजयाचा महत्त्वाचा टप्पा ठरली. घटना: अफझल खानने आपल्या प्रचंड सैन्यासह शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्याचा निर्धार केला होता. तो…

पुढे वाचा

राजर्षी छत्रपती शाहु महाराज

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे महान समाजसुधारक आणि आधुनिक विचारांचे राजे होते. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि मागासवर्गीय घटकांसाठी अनेक क्रांतिकारी सुधारणा केल्या. त्यांच्या कार्यामुळे त्यांना “राजर्षी” हा मान मिळाला. जन्म व बालपण छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर संस्थानात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते. बालपणी त्यांना दत्तक घेऊन कोल्हापूरच्या…

पुढे वाचा
Rakshas

राक्षस आणि राजा

एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो ‘आता मी तुला खाणार आहे.’ राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन. राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस?…

पुढे वाचा

“स्वतःची ओळख”

एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते, जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात, प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात, जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याचदरम्यान आकाशात उंच उडणारी घार सुध्दा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, पण त्याचवेळी घाईत…

पुढे वाचा

वृक्षाचे महत्त्व

एका लहानशा गावात रोहित नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप खोडकर होता. त्याला झाडांशी काही प्रेम नव्हतं. गावात खूप झाडं होती – आंबा, वड, पिंपळ, गुलमोहर इ. पण रोहित दररोज एक झाड तोडण्याचा हट्ट करत असे. तो म्हणायचा, “झाडं कशाला हवीत? जागा मोकळी झाली की खेळायला बरं वाटतं!” त्याचे वडील खूप समजूतदार होते. त्यांनी…

पुढे वाचा

गाढवाचा शहाणा सल्ला

एका लहानशा खेडेगावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो फार मेहनती आणि साधा माणूस होता. त्याच्याकडे एक गाढव होतं — नाव होतं “भोलू”. भोलू दररोज शेतातील माल गावातल्या बाजारात नेत असे. रामू त्याच्या पाठीवर जड पोती ठेवून त्याच्यावर अवलंबून असे. भोलू फार कष्टाळू होता. पण एक दिवस, उन्हाने तापलेलं आणि पाठीवर जड ओझं असलेलं…

पुढे वाचा

सरखेल कान्होजी: समुद्राचा अजिंक्य राजा

सतराव्या शतकाच्या अखेरीस, भारताची पश्चिम किनारपट्टी परकीय सत्तांच्या लालसेचे केंद्र बनली होती. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच व्यापारी कंपन्या केवळ व्यापारासाठी नव्हे, तर समुद्रावर आणि जमिनीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होत्या. समुद्रावर त्यांचीच हुकूमत चालायची. अशा काळात, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला एक मराठा योद्धा समुद्राचा राजा म्हणून उदयास आला, ज्याने युरोपीय सत्तांना सलग चाळीस…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा