Ved

रेड्याच्या मुखी वेद

आळंदीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित करण्यासाठी आपला जीव दिला.त्यांच्या मुलांना त्यांची आपली मुंज व्हावी आणि समाजाने आपल्याला स्वीकारावे ही इच्छा माहीत होती, त्यासाठीच त्यांनी जीव दिला होता.त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना पुन्हा आमची मुंज लावुन द्या अशी विनंती केली.आता आळंदीच्या लोकांकडे काही उत्तर नव्हते. विठ्ठलपंत बैठकीतले म्हणणे एवढे गांभीर्याने घेऊन जीव देतील असे त्यांना वाटले…

पुढे वाचा

“शून्यातून शिखराकडे”

राजेश गावातल्या एका लहानशा कुटुंबात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात फार काही नव्हतं—ना पैशाचं सुख, ना मोठं घर, ना शाळेसाठी महागडं साहित्य. पण एक गोष्ट होती—स्वप्न. राजेशच्या डोळ्यात शिक्षणाचं, यशाचं आणि कष्टाने आयुष्य घडवण्याचं स्वप्न होतं. शाळा गावीच होती. दररोज चार किलोमीटर चालत तो शाळेत जात असे. त्याच्याकडे वह्या कमी, पण चिकाटी प्रचंड होती. शाळेत तो…

पुढे वाचा

सोनेरी शिंगाचे  हरिण

एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग…

पुढे वाचा
labad kolha

कावळा आणि कोल्हा

एका कावळ्याला एक छान चीजचा तुकडा मिळाला. तो आनंदाने झाडावर जाऊन खायला बसला. एका कोल्ह्याने हे पाहिले. कोल्हा उपाशी होता, कावळ्याच्या चोचीत तो चीजचा तुकडा पाहुन त्याच्या तोंडाला पाणी सुटले.  तो झाडाखाली गेला आणि कावळ्याशी बोलायचं प्रयत्न करू लागला. त्याचे फार कौतुक करू लागला. तो म्हणाला “लोक उगीच त्या कोकिळेचं फारच कौतुक करतात बाबा. खरं तर तुझा आवाज सुद्धा…

पुढे वाचा
Sangitachi Jadu

संगीताची जादु

एके काळी एका गावात उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. जिथे बघावे तिथे लहान मोठे उंदीर दिसायचे. हे उंदीर फार नासाडी करायचे. शेतातील पिके, घरात, दुकानात साठवलेले धान्य फस्त करून टाकायचे. कपाटातले कपडे कुरतडून टाकायचे. गावातल्या लोकांचं खुप नुकसान झालं आणि चालुच होतं. लवकरच तिथे दुष्काळ वाटावा इतकी भयंकर परिस्थिती ओढवली असती. इतक्या मोठ्या संख्येने उंदीर झाल्यामुळे…

पुढे वाचा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा
kabutar

कबुतर आणि पारधी 

एक पारधी अरण्यात कबुतर धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, ‘अरे, हे तू काय करतो आहेस?’ यावर पारधी म्हणाला, ‘तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे कबुतर येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्‍हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.’ कबुतरला…

पुढे वाचा
Cat

दुध न पिणारी मांजर

एकदा राजधानीमध्ये उंदरांचा फार सुळसुळाट झाला होता. सर्वांच्या घरी भरपुर उंदीर झाले होते आणि ते अन्न धान्याची नासाडी करायचे, कपडे कुरतडुन ठेवायचे. सर्वांना खुप त्रास होत होता. नागरिकांचा त्रास दुर करण्यासाठी महाराजांनी सर्वांच्या घरी मांजर पुरवायचे ठरवले. आणि त्या मांजरीला सशक्त ठेवायला त्यांनी ज्यांच्या घरी दुधाची सोय नव्हती अशा लोकांना गायसुद्धा दिली. तेनालीरामन आपल्या घरी गाय आणि…

पुढे वाचा

काळ्या गडद रात्रीची चांदणी

एकदा एक छोटा गाव होता, जिथे एक लहानसा मुलगा राहात होता. त्याचे नाव होते आर्यन. आर्यनला चंद्र आणि ताऱ्यांची खूप आवड होती. तो नेहमी रात्री बाहेर जाऊन आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत असे. त्याला वाटायचं की, तारे त्याला काहीतरी सांगत आहेत. एक रात्री, आर्यनने पाहिलं की चंद्र खूप सुंदर आणि उजळ आहे. त्याने ठरवलं की, तो चंद्राला…

पुढे वाचा
Chindhi

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना…

पुढे वाचा