
अर्जुनाची एकाग्रता
पितामह भीष्मांनी हस्तिनापूरच्या लहान राजकुमारांना सर्व शस्त्रे चालवणे शिकवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांना नेमले होते. १०० कौरव, ५ पांडव आणि स्वतः द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा असे सर्वजण द्रोणाचार्यांच्या हाताखाली शिकत होते. एक दिवस द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची धनुर्विद्येची म्हणजे धनुष्य बाण चालवण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना गोळा केले. समोर काही अंतरावरच्या झाडाच्या फांदीवर त्यांनी एक खोटा पक्षी ठेवला. शिष्यांना सांगितले…