sejal

Arjun

अर्जुनाची एकाग्रता

पितामह भीष्मांनी हस्तिनापूरच्या लहान राजकुमारांना सर्व शस्त्रे चालवणे शिकवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांना नेमले होते. १०० कौरव, ५ पांडव आणि स्वतः द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा असे सर्वजण द्रोणाचार्यांच्या हाताखाली शिकत होते. एक दिवस द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची धनुर्विद्येची म्हणजे धनुष्य बाण चालवण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी सर्व शिष्यांना गोळा केले. समोर काही अंतरावरच्या झाडाच्या फांदीवर त्यांनी एक खोटा पक्षी ठेवला.  शिष्यांना सांगितले…

पुढे वाचा
Shivrajyabhishek Sohala

शिवराज्याभिषेकसोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या विरुद्ध…

पुढे वाचा
eyes

नेत्रदानाचीगोष्ट

काही जणांना दुर्दैवाने जन्मतः डोळे नसतात, किंवा काही जणांचे अपघाताने किंवा आणखी कोणत्या समस्येने डोळे निकामी होतात. असे लोकसुद्धा आपल्या मेहनतीने, चिकाटीने डोळस लोकांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करत स्वाभिमानाने जगात असतात.पण त्यांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिसत नसल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना त्रास होतो. आता हळूहळू अंध आणि अपंग व्यक्तींनासुद्धा वावरता…

पुढे वाचा
Vatpronima

वटपौर्णिमा

एके काळी मद्र देशात एक राजा होता. त्याचे नाव अश्वपती. मालविका त्याची राणी होती. राजा राणीला अनेक वर्षे मुल होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सूर्यदेवाची आराधना केली. सुर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने राजा राणीला अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि गुणवान मुलगी झाली. सूर्यदेवाचे एक नाव आहे सावित्र. सूर्यदेवाच्या कृपेने झालेल्या या कन्येचे नाव तिच्या आई वडिलांनी सूर्याच्याच…

पुढे वाचा
Chindhi

चिंधी

एकदा कृष्ण इंद्रप्रस्थात पांडवांच्या घरी राहायला गेला होता. तेव्हा नारद मुनी तिथे कृष्णाला भेटायला आले. कृष्णाची सख्खी धाकटी बहीण सुभद्रा हिचे लग्न अर्जुनाशी झाले होते. आणि पाचही पांडवांशी लग्न झालेली द्रौपदीसुद्धा कृष्णाला बहिणीसमानच जवळची होती. त्यांचे नाते मानलेल्या भावा बहिणीचे होते. नारदाचे डोके बऱ्याचदा तिरकस चालत असे. त्यांनी कृष्णाला विचारले “प्रभु तुम्हाला आधीच एक सख्खी बहीण असताना…

पुढे वाचा
parrot

पोपटाचेध्यान

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा म्हणुन…

पुढे वाचा
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा
Dog

कुत्र्याचे प्रतिबिंब

एक कुत्रा होता. त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता. त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले. त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली. भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन गेले. हताश होऊन तो कुत्रा आणि…

पुढे वाचा
Gandhi

गरज आणि उधळपट्टी

महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”“आज…

पुढे वाचा
Ganpati

श्री गणपतीची कहाणी

निर्मळ मळे, उदकांचे तळे, वेल वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे-रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यायचा? श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चवथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करून त्यांतील सहा देवाला, सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे. अल्पदान, महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे. त्यास…

पुढे वाचा