runali golambade

गुणी आंबा

आंबा पिकितो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ ..परीक्षा आटोपल्या, निकाल लागलेत आणि बच्चेकंपनी पुढच्या वर्गात जाण्याची तयारी करणार आहे. पण त्या अगोदर हातात असलेल्या लाडक्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटून ताजंतवानं व्हायचं आहे. मगच पुढच्या तयारीचा विचार, होय ना ? अर्थातच. काय मग. गावाला जायचा बेत आहे की घरीच पाहुणेमंडळी जमणार आहेत ?  गावाला…

पुढे वाचा

माझा विघ्नहर्ता

पृथ्वीवर गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आणि कैलासावर बालगणेशाची चुळबूळ वाढली. यावेळी मातेला सांगून गणेशोत्सवात पृथ्वीवर फेरफटका मारायचाच, असा निश्चय त्याने केला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आठवडाभर आधी त्याने माता पार्वतीच्या डोक्याशी भुणभुण चालू केली. “चल ना गं आई, जरा फिरून येऊ. किती कंटाळा आलाय दररोज तेच तेच खेळ खेळून…” सुरुवातीला मातेने फार लक्ष दिले नाही, पण…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा

अष्टावधानी विवेकानंद

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांच्या कुमारवयातली ही एक गोष्ट- १२ जानेवारी १८६३ या दिवशी कलकत्त्यातील दत्त कुटुंबाच्या विश्वनाथ बाबू आणि भुवनेश्वरी देवी यांना मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नरेंद्र ठेवलं. हा नरेंद्र म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद! शिकागो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्मपरिषदेत केवळ, ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ या…

पुढे वाचा

सिंहाचे  कातडे पांघरलेले गाढव

 एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या  प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.           एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत…

पुढे वाचा

पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.” उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी…

पुढे वाचा

वाईट संगतीचे परिणाम

एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्‍याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले…

पुढे वाचा

गाढवाला मिळाली शिक्षा

एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे. एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि…

पुढे वाचा

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक 

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा