pooja

माझा देवच मला वाचवेल

एका गावात एक साधु महाराज राहायचे. गावातल्या मंदिरात पूजा, भजन कीर्तन करायचे. दिवसभर देवाचा जप करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांची मोठे देवभक्त म्हणुन ख्याती होती. अनेक लोक त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला यायचे.  एके वर्षी त्या विभागात प्रचंड पाऊस झाला. सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा इशारा दिला. गावकरी हळू हळू गाव सोडून तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊ लागले….

पुढे वाचा

गर्विष्ठ दिवा

एका माणसाच्या घरी एक खुप सुंदर दिवा होता. अगदी सुबक, रेखीव नक्षीकाम केलेला, चमकदार.  तो माणुस त्या दिव्याला नेहमी लख्ख पुसुन ठेवायचा. रोज तेल घालुन नवी वात लावायचा. त्यामुळे त्या दिव्याचा पूर्ण खोलीत छान प्रकाश पसरायचा. त्या माणसाकडे येणारे लोक नेहमी त्या दिव्याचं कौतुक करायचे.  “किती सुंदर दिवा आहे” “काय छान प्रकाश पडलाय”  “या दिव्यामुळे घर…

पुढे वाचा

कृती आधी उपदेश नंतर

एक मुलगा तलावात पोहायला गेला. त्याला नुकताच पोहायला शिकला होता, त्याला पोहण्याचा फार काही अनुभव नव्हता.  पोहता पोहता तो तलावात जरा आत गेला जिथे खोली जास्तच होती. त्याला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तो फार घाबरला आणि हातपाय मारायला लागला. पण भीतीमुळे त्याला नीट पोहता येईना. तो ओरडायला लागला. एक वाटसरू तिथुन जात होता. त्या मुलाने…

पुढे वाचा

खारीचा वाटा

सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती.  ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले. आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पुल/ ब्रिज) बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे मोठे दगड आणुन त्यावर…

पुढे वाचा

समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य कल्याण !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण! गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली,त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी. त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थरामदासस्वामींनी अंबाजी ला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले. ही फांदी तोडतांना विहिरीत पडण्याचा धोका होता; तरीही अंबाजीने गुरुआज्ञा प्रमाण मानून कुर्‍हाडीने फांदी तोडण्यास आरंभ केला. फांदी तोडण्यात…

पुढे वाचा

कोल्ह्याची फजिती

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो.” मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.” “तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले. “अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला,…

पुढे वाचा

सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु

एका जंगलात तिथला राजा सिंह म्हातारा झाला होता.  त्याचा सेवक कोल्हा त्याला मदत करत असे.  एकदा सिंहली आजाराने ग्रासले. त्याला शिकार करणेही फार अवघड झाले.  कोणी तरी त्याला सांगितले कि गाढवाचा मेंदू खाल्ला तर त्याला बरे वाटेल.  त्याने कोल्ह्याला एखाद्या गाढवाला आपल्याकडे घेऊन यायला सांगितले.  कोल्हा गाढवाच्या शोधात निघाला आणि त्याला एक गाढव सापडले.  त्याने…

पुढे वाचा

संत सावता माळी

संत सावता माळी हे संत ज्ञानेश्वरांच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्ती परंपरेतले एक महान संत होते. परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटीत, एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या देवाधर्माला, अध्यात्माला, भक्ती परंपरेने सर्व चौकटी मोडत घराघरात पोहचवले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातींमधले अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले, आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातुन…

पुढे वाचा

उंदराची टोपी

एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.  आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी…

पुढे वाचा