ही कथा भगवंत विष्णूचे द्वारपाल – जय आणि विजय यांची आहे. ही एक पुराणकालीन कथा आहे. ही कथा भक्ती, अहंकार, आणि पुनर्जन्माच्या रहस्याने भरलेली आहे.
भगवान विष्णू वैकुंठधामात निवास करत होते. त्यांच्या दरवाज्याजवळ दोन बलाढ्य द्वारपाल उभे असत – त्यांची नावे होती जय आणि विजय. ते दोघे अत्यंत बलाढ्य, भक्त आणि विष्णूंना अतिशय प्रिय होते. पण त्यांच्या मनात थोडासा अहंकार होता की, “आम्ही वैकुंठाचे रक्षक आहोत!”. एक दिवस ब्रह्मदेवाचे मानसपुत्र – सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार हे चार ऋषी (जे बालकांच्या रूपात होते) वैकुंठधामात भगवान विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी आले. परंतु जय आणि विजय यांनी त्यांना अडवलं. ते म्हणाले, “ही जागा फक्त देवतांसाठी आहे. तुम्ही लहान मुले वाटता, तुम्हाला आत जाऊ देणार नाही.”

ऋषींनी विनंती केली, पण जय-विजय गर्वाने अडून राहिले. हे पाहून ऋषींना राग आला. त्यांनी शाप दिला:
“तुम्ही अहंकाराने भरलेले आहात. तुम्ही भक्ती सोडून द्वेषमार्गाने जाल. म्हणून तुम्ही वैकुंठातून जन्म घेऊन त्रैलोक्यात राक्षस म्हणून जन्माल याल!”
जेव्हा भगवान विष्णूंना या शापाची माहिती मिळाली तेव्ह लगेच भगवान विष्णू प्रकट झाले. त्यांनी ऋषींचा शाप नाकारला नाही. पण जय-विजय त्यांना शरण गेले आणि म्हणाले, “हे प्रभो, आम्हाला लवकर पुन्हा तुमच्याजवळ यायचं आहे.” तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन द्वारपालांना पर्याय दिला आणी विष्णूंनी सांगितले “तुमच्यासाठी दोन पर्याय आहेत – १. सात जन्म घ्या – पण माझे भक्त म्हणून।
२. फक्त तीन जन्म घ्या – पण माझे शत्रू म्हणून, मी स्वतःच तुम्हाला ठार करीन।”
जय-विजयांनी दुसरा मार्ग निवडला, कारण ते लवकरच प्रभूंच्या चरणी परत यायचे इच्छित होते.
पहिला जन्म: हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू :
जय आणि विजयांनी पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या राक्षस बंधूंमध्ये घेतला.
हिरण्याक्ष पृथ्वीला पाताळात घेऊन गेला. तो इतका बलवान होता की देवताही त्याला पराभूत करू शकत नव्हत्या. पृथ्वी संकटात आली. विष्णूंनी वराह अवतार घेतला – एक महाकाय वराह (डुक्कराच्या स्वरूपात). त्यांनी पाताळात जाऊन हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीला वर उचलून जागेवर ठेवले.

हिरण्यकश्यपू विष्णूंवर रागावले. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला – “माझा मृत्यू न दिवसा, न रात्री, न माणसाकडून, न प्राण्याकडून, न घरात, न बाहेर…” पण त्याचा पुत्र प्रह्लाद हा विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो वाचला. शेवटी विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला – अर्धा मानव, अर्धा सिंह. संध्याकाळी, उंबरठ्यावर, त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला. या प्रकारे पहिल्या जन्मातील मुक्ती झाली.
दुसरा जन्म: रावण आणि कुंभकर्ण :

दुसऱ्या जन्मात जय-विजय झाले रावण आणि कुंभकर्ण – लंकेचे राजा आणि त्याचा भाऊ. रावण महान शिवभक्त, विद्वान आणि शक्तिशाली होता, पण गर्वाने भरलेला होता. त्याने सीता माताचे अपहरण केले. त्यामुळे रामायण घडलं. प्रभू श्रीरामाने वानरसेनेसह लंका जिंकली आणि रावणाचा वध केला.
कुंभकर्ण, जो सहा महिने झोपायचा आणि एकदा जागा झाला की प्रचंड शक्तिशाली व्हायचा, तोही रामाच्या युद्धात मारला गेला. या जन्मातही जय आणि विजयने प्रभूच्या हातून मुक्ती मिळवली.
तिसरा जन्म: शिशुपाल आणि दंतवक्त्र :
तिसऱ्या जन्मात जय आणि विजय झाले शिशुपाल आणि दंतवक्त्र . दोघेही श्रीकृष्णाचे विरोधक होते. शिशुपालाने श्रीकृष्णाचा सतत अपमान केला. श्रीकृष्णाने त्याला १०० अपशब्द माफ केले, पण १०१वा झाल्यावर सुदर्शनचक्राने त्याचा वध केला.
दंतवक्त्रही कृष्णाच्या विरोधात होता आणि कुरुक्षेत्र युद्धात त्याचा वध झाला.
तीन जन्म पूर्ण होताच, जय आणि विजय पुन्हा वैकुंठात परत आले. त्यांनी प्रभू विष्णूच्या चरणी शरणागती पत्करली.

या गोष्टीतून शिकवण :
जय-विजय ही उदाहरणं आहेत की, परमेश्वराचा प्रेम असो वा क्रोध – तोही मोक्षाचा मार्गच असतो.