श्रीकृष्ण जन्माची कथा

ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हिस्कावून घेतली. राजा कंसची एक बहीण होती देवकी, जिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एके दिवशी कंस आपल्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी जात होता. त्याचवेळी एक आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी अशी होती की, देवकीच्या पोटी जो आठवा पुत्र जन्माला येईल तो तुझा वध करेल.’ हे ऐकून कंस चांगलाच घाबरुन गेला. आणि त्याने वासुदेवाला मारण्याचा विचार केला. त्याचे ते विचार ऐकून देवकीने त्याची गयावया केली. ती म्हणाली की, माझ्या पोटी येणाऱ्या पुत्रासाठी तू माझ्या पतीला का मारशील? त्यापेक्षा मीच माझा पुत्र तुझ्या स्वाधीन करेन. हे ऐकून काहीसा समाधानी झालेल्या कंसाने त्या दोघांना कारागृहात बंद करण्याचा निर्णय घेतला

कारागृहात देवकी- वासुदेव यांना 7 पुत्र झाले तिने राजा कंसला ते सगळे पुत्र देऊन टाकले. त्याला ऐकू आलेल्या आकाशवाणीच्या भीतीने त्याने देवकीचे ते सातही पुत्र मारुन टाकले. देवकी पुन्हा एकदा गरोदर राहिली. आता यावेळी तिला पुत्र झाला तर तो तिला कंसाला देणे गरजेचे होते. पण देवकीआ आणि वासुदेव यांना आता त्यांचे हे दु:ख सहन होत नव्हते. त्यांनी बाळाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रार्थना केल्या. ज्यावेळी त्यांना पुन्हा एकदा पुत्र झाला. त्यावेळी त्यांना आनंद झाला. परंतु त्यासोबत हा मुलगाही कंस मारुन टाकेल याची भिती वाटली. परंतु त्याचवेळी त्यांच्या कारागृहात एक लख्ख प्रकाश चमकला. हातात चक्र, गदा, कमळ धारण केलेला आणि चारभुजा असलेला देव प्रकटला. हे पाहून त्यांना फार आनंद झाला. त्या दोघांनीही त्याचे पाय धरले. त्यांचे दु:ख जाणून त्या दोघांना सांगितले की, या बाळाला घेऊन राजा नंद यांच्या घरी जा. असे सांगितले. आणि त्या देवाने लहान बाळाचे रुप धारण केले.

राजा नंद यांची पत्नी सुद्धा त्याचवेळी गर्भवती होती. तिच्या पोटी मुलगी जन्माला आली. ती कन्या एक मायावी रुप होते. त्या मुलीच्या जागी या बाळाला ठेवण्याचे वासुदेवाला सांगण्यात आले. परंतु बाहेर विजा चमकत होत्या, पाऊस धो धो पडत होता. अशावेळी या लहान बाळाला घेऊन कसे काय जायचे? असा प्रश्न पडला. त्यावेळी त्या प्रकटलेल्या देवाने सगळे मार्ग मोकळे होतील असे सांगितले होते. आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी वासुदेव भर पावसात एका टोपलीत बाळाला घेऊन निघाले. त्यावेळी कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले. कारागृहाचे पहारेकरी झोपून गेले. उसळलेल्या यमुना नदीने देखील मार्ग उपलब्ध करुन दिला. त्यामुळे राजा नंदकडे जाणे सोपे झाले. राजा नंद आणि राणी झोपी गेली होती. त्यांच्या पाळण्यात कन्या होती. त्या कन्येला घेऊन आणि आपल्या पुत्राला पाळण्यात ठेवून वासुदेव निघाले.

ज्यावेळी ते कारागृहात पोहोचले. त्यावेळी कंसाला देवकी बाळंतीण झाल्याचे कळले. त्याचक्षणी त्याने झालेल्या बाळाला घेऊन येण्याची आज्ञा दिली. कन्येला घेऊन पहारेकरी कंसकडे गेले. आपला कर्दनकाळ असलेली ही कन्या आताच मारुन टाकण्यासाठी त्याने तिला जमिनीवर आपटले. त्याच क्षणी ती मायावी कन्या हवेत उडाली., म्हणाली, अरे मुर्खा तुला मारणाऱ्याने आधीच जन्म घेतला आहे आणि तो राजा नंदच्या घरी अगदी सुखरुप आहे. मला मारुन काहीही होणार नाही. तुझ्या पापाची शिक्षा तुला लवकरच मिळणार आहे. असा झाला देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म. आपल्या पोटी जन्माला आलेला कोण आहे हे काही या दोघांना माहीत नव्हते. पण लवकरच त्याच्या लिला सगळ्यांना कळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *