abcde

दुध भाई

एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.  तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.  अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.  ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे…

पुढे वाचा
abcd

फटक्यांचे बक्षीस

महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.  महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.  बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा
GHODYACH MALAK

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा
Don Mitra

दोन मित्र आणि अस्वल – (Don Mitra Ani Aswal)

एका छोट्या गावात मुकेश आणि राकेश नावाचे दोन जिवलग लहानपणीचे मित्र रहात होते. मुकेश हा शरीराने बारीक व राकेश हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या मोठ्या गावात घोड्याची सवारी करायला जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’ वाटेत पुढे जाताना त्यांना एक…

पुढे वाचा

श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच…

पुढे वाचा

सत्याची ताकद

एका गावात एक छोटा मुलगा राहायचा. त्याचं नाव होतं अर्जुन. अर्जुन खूपच साधा, सरळ आणि प्रामाणिक मुलगा होता. तो नेहमी आई-वडिलांचं ऐकायचा, शाळेत नीट अभ्यास करायचा आणि कोणी खोटं बोललं की लगेच म्हणायचा, “सत्य बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे.” पण गावातले इतर काही मुले त्याची थट्टा करायचे. त्यांना वाटायचं की खोटं बोलून, थोडं फसवून लवकर फायदा…

पुढे वाचा
mungi Ani Kabutar

कबुतर आणि मुंगी 

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

चतुर कोल्हा आणि गर्विष्ठ सिंह

एका मोठ्या जंगलात सर्व प्राणी शांततेत राहत होते. जंगलामध्ये एक जुना सिंह राजा होता, जो आता वृद्ध झालेला होता. त्याला हिंस्रपणा सोडून योग, ध्यान आणि शाकाहार याकडे ओढ निर्माण झाली होती. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी निर्धास्त होते. परंतु एक दिवस जंगलात एक नवीन, तरुण, उर्जावान आणि अत्यंत गर्विष्ठ सिंह दाखल झाला. त्याने पहिलेच येताच एक…

पुढे वाचा
Shrimant Vyapari

श्रीमंत व्यापारी

एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.  तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला…

पुढे वाचा
Hushar kolha

हुशार कोल्हा आणि धूर्त कावळा

एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते.तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन…

पुढे वाचा

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की,…

पुढे वाचा
t5xryns

अकबराचा वाढदिवस

अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता.  अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्याचा दबदबा फार मोठा होता. दूरदूरच्या राजांकडून यानिमित्ताने शुभेच्छा संदेश येत होते. त्यासोबतच त्या राजांचे दूत अकबरासमोर विविध नजराणे सादर करत होते. त्यात भरजरी कपडे, सुवर्णमुद्रा, सुंदर रत्ने आणि अलंकार इत्यादींचा…

पुढे वाचा