GHODYACH MALAK

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला…

पुढे वाचा
abcd

फटक्यांचे बक्षीस

महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.  महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.  बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा
abcde

दुध भाई

एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.  तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.  अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.  ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे…

पुढे वाचा
Hushar Beduk

हुशार बेडूक

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो. तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात…

पुढे वाचा
Hushar Mulga Ani Chor

हुशार मुलगा आणि चोर

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, आपल्या इतके हुशार कोणीच नाही. यथे मला मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कोठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाले नाही . एके दिवशी…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड गोष्ट

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा
Kolha & Makad

कोल्हा आणि माकड

एका जंगलात एका सिहांचे राज्य होते. एका दिवशी तो सिह मेला.  त्याच्यानंतर राजा कोणी व्हावे हे ठरवण्यासाठी प्राण्याची सभा भरली. माकड आणि कोल्हा निवडणुकीला उभे राहिले. दोघांचे भाषण झाले. माकडाने कोल्ह्यापेक्षा खुप छान भाषण केले . सगळ्याचे मनोरंजन करून सगळयांना प्रभावित केले. प्राण्यानी एक मताने माकडाला निवडून दिले. माकड राजा झालेला बघुन कोल्ह्याचा जळफळाट झाला. कोल्ह्यने माकडाला धडा शिकवण्यचे ठरवले.   कोल्हा…

पुढे वाचा

श्री गणेश जन्माची कहाणी

भगवान शिव आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहायचे आणि ते त्यांचे निवासस्थान होते. बहुतेक वेळा, शिव इतर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी बाहेर असायचे तर पार्वती पर्वतावर एकटी असायची.एके दिवशी, अशाच एका प्रसंगी, पार्वतीला स्नान करायला जावे लागले आणि तिला कोणीही त्रास देऊ इच्छित नव्हते. पार्वतीने हळदीपासून एका मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात जीवन फुंकले. तिने बाळाला…

पुढे वाचा
Elephant

हत्ती आणि उंदीर

एक गाव होते. भूकंपानंतर उध्वस्त झाल्यानंतर तेथील लोकांनी ते गाव सोडून दिले होते. मात्र, गावात राहणार्‍या उंदरांनी तिथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला. या गावाच्या सीमेवर एक तलाव होता. तिथे हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे. या तलावाच्या वाटेवरच गाव असल्याने तेथे फिरताना हत्तींनी उंदरांना तुडवले. म्हणून, उंदरांच्या राजाने हत्तींना भेटण्याचा…

पुढे वाचा

पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.” उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी…

पुढे वाचा

पानिपतचे तिसरे युद्ध (1761)

पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अफगाणी सरदार अहमदशहा अब्दाली यांच्या सैन्यादरम्यान 14 जानेवारी 1761 रोजी झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भयावह लढायांपैकी एक मानले जाते. पार्श्वभूमी:18व्या शतकात मराठा साम्राज्य भारतातील प्रमुख शक्ती बनले होते. त्यांनी दिल्लीवर आपला प्रभाव प्रस्थापित केला होता.अफगाणिस्तानातील अहमदशहा अब्दालीने भारतातील संपत्ती लुटण्यासाठी अनेक वेळा हल्ले केले….

पुढे वाचा

🔮 “भिंत चालली! आणि योगी थक्क झाले…” – संत ज्ञानेश्वरांची अद्भुत कथा

पैठण नगरीत एकदा एक खूपच अहंकारी योगी आले – चांगदेव योगी.वर्षानुवर्षे तपश्चर्या करून, वाघावर बसून, नागाला दोरीसारखा वापरून ते अलंदीला आले.कारण काय?त्यांना ऐकून आलं होतं की “काही लहान पोरं फारच तत्वज्ञानाचं ज्ञान पाजळत आहेत!” चांगदेव योगी मनात म्हणाले,“कसले येत असेल ज्ञान… मीच दाखवतो त्यांना सिद्धी म्हणजे काय!” ते थेट वाघावर स्वार होऊन, नाग हातात घेत,…

पुढे वाचा

दयाळू कबुतर आणि मुंगी

एका मोठ्या नदीकिनारी एक मोठे झाड होते. त्या झाडावर एक कबुतर राहत होते. त्याच नदीकिनारी एका मुंगीचे वारूळ होते. एकदा एक मुंगी पाणी पिण्यासाठी नदीवर गेली. पाणी पिताना तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह खूप जोरदार होता आणि मुंगी त्यात वाहू लागली. तिला वाटले की आता ती वाचणार नाही. झाडावर बसलेल्या कबुतराने…

पुढे वाचा