GHODYACH MALAK

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला…

पुढे वाचा
abcd

फटक्यांचे बक्षीस

महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.  महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.  बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा
Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा
abcde

दुध भाई

एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.  तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.  अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.  ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे…

पुढे वाचा

बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड

१६६० साली शिवाजी महाराज पन्हाळगडावर मोगलांच्या वेढ्यात अडकले होते. महाराजांना सुरक्षित पळवून नेण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पावनखिंडीत मोगल सैन्याला रोखून धरण्याची जबाबदारी घेतली. शिवाजी महाराजांनी अंधारात पन्हाळगड सोडला आणि विशाळगडाकडे निघाले. मोगल सैन्याने पाठलाग केला, पण पावनखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या ३०० मावळ्यांसह त्यांना अडवलं. मोगल सैन्य खूप मोठं होतं, पण बाजीप्रभूंनी आपल्या तलवारीच्या…

पुढे वाचा

टोपीवाला आणि माकड…

एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते. म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या खाली चांगली ताणून देतो. पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोड्यावेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो…

पुढे वाचा
Kashtachi Kamai Shreshat

कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ

एका गावात दोन चोर राहत होते. ते प्रत्‍येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्‍से मध्ये वाटून घेत. आपापला हिस्‍से स्‍वत:साठी व एक हिस्‍सा ईश्‍वराला ठेवतात.असे खूप दिवस चालत होते .एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले. बरीच वेळ भटकंती करूनहीसुद्धा त्‍यांना काही चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही.ते दोघेही थकून एका मंदिरात बसले. तेथे त्‍यांना एक…

पुढे वाचा

सोन्‍याचा मुकुट आणि चांदीचे पाय

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविलेभगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही…

पुढे वाचा

शिवराज्याभिषेक सोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या…

पुढे वाचा

निळा राजा 

एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत  होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते  घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते. त्या परटाने  कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र…

पुढे वाचा

सिंहाची कथा

एका घनदाट जंगलात एक सिंह राहायचा. त्याचे नाव शेरखान होते. शेरखान जंगलाचा राजा मानला जात असे, कारण त्याच्या शक्तीशाली गर्जनेने सगळे प्राणी घाबरून जायचे. त्याची ताकद, वेग, आणि साहस हे त्याच्या शासनाचे प्रतीक होते. शेरखानला त्याच्या सामर्थ्याचा फार अभिमान होता. तो इतर प्राण्यांशी कधीच चांगले वागत नसे. तो इतरांना नेहमी त्रास देत असे आणि त्यांना…

पुढे वाचा

चतुर शेतकरी

एक गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता. तो खूपच बुद्धिमान, मेहनती, आणि सकारात्मक विचारांचा होता. तो आपली शेती अतिशय चांगल्या प्रकारे करत असे. रामू नेहमी काहीतरी नवीन शिकायचा, प्रयोग करायचा, आणि संकटांवर तोडगा काढायचा प्रयत्न करत असे. एका वर्षी गावात मोठा दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. तलाव, विहिरी कोरड्या पडल्या. बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं…

पुढे वाचा
Kombda & Moti

कोंबडा आणि मोती

एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता. दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला. कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला. मोती खुप छान दिसत होता. कोंबडा मोत्याला म्हणाला “तु तर फार किंमती रत्न दिसतोस. पण तरीही तुझा मला काहीही उपयोग नाही. तुझ्यापेक्षा एखादा दाणाच माझ्या जास्त कामाचा आहे.” असे म्हणुन कोंबड्याने त्या मोत्याला सोडुन पुन्हा दाणे टिपायला…

पुढे वाचा

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती.दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता.ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं. तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता.तो म्हणाला…

पुढे वाचा