Lakudtodya

लाकूडतोड्याची कुऱ्हाड

एक होता लाकूडतोड्या. तो अतिशय गरीब होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडुन आणायचा आणि ते विकुन आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवायचा.  एक दिवस त्याला जंगलात सुक्या लाकडासाठी खुप वेळ उन्हात फिरावं लागलं, पण फारसं लाकुड मिळालं नाही. उन्हात फिरल्यामुळे त्याला तहानही लागली. तो एका विहिरीजवळ गेला आणि तिथुन पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कुऱ्हाड…

पुढे वाचा
GHODYACH MALAK

घोड्याचा खरा मालक

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला.  कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता.  कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले.  बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले.  तो म्हणाला…

पुढे वाचा
abcd

फटक्यांचे बक्षीस

महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.  महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.  बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते. …

पुढे वाचा
popat

पोपटाचे ध्यान.

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे.  बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता.  एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा
akbar birbal

अकबर बिरबलाची पहिली भेट.

बिरबल अकबराचा लाडका मंत्री होता. बिरबलाने अकबराच्या वर्षात अनेक वर्षे शेवटपर्यंत सेवा केली. पण ह्या दोघांची भेट कशी झाली ती गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. हीच गोष्ट मी आज तुम्हाला दोन भागात सांगणार आहे.  अकबराला प्रजेचे हालहवाल समजुन घ्यायला वेषांतर करून राजधानीत फिरायला आवडत असे. असं फिरल्यामुळे त्याला प्रजा समाधानी आहे कि नाही, ते बादशाहाबद्दल कसा विचार…

पुढे वाचा
abcde

दुध भाई

एक दिवस बिरबल अकबराला भेटायला त्याच्या महालात गेला.  तेव्हा तिथे अजून एक माणुस बसलेला होता.  अकबराने बिरबलाची त्याच्याशी ओळख करून दिली. “बिरबल, हा माझा दुध भाई.” एखाद्या बाळाच्या लहानपणी त्याची आई नसेल किंवा आजारी असेल तर त्या बाळाला दुध कमी पडू नये म्हणुन दुसऱ्या स्त्रीचे दुध पाजु शकतात.  ती स्त्री आपले दुध पाजुन आईसमान बनल्यामुळे…

पुढे वाचा

📜 “धर्मवीर रामाचा वनवास”

एकदा अयोध्या नगरीमध्ये आनंदाचे वातावरण होते. राजा दशरथ आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला राजा बनवण्याची तयारी करत होते. संपूर्ण नगर दीपांनी उजळले होते. परंतु नियती काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. कैकेयी, दशरथाची पत्नी, तिच्या दोन वरांच्या स्मरणाने व्याकुळ झाली. तिने रामाला चौदा वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य देण्याची मागणी केली. राजा दशरथ दुःखाने कोसळले. रामाने मात्र…

पुढे वाचा
ab

समुद्राचे लग्न

एकदा बादशहा अकबर बिरबलावर नाराज झाला आणि त्याने बिरबलाचा दरबारात अपमान करून त्याला कामावरून काढुन टाकले. बिरबल राजधानी सोडुन कोणालाही काही न सांगता निघुन गेला.  असेच दिवस गेले आणि अकबराला बिरबलाची उणीव जाणवायला लागली. त्याच्या इतकं कोणी शिताफीने काम करत नसे, दरबारातले प्रश्न चुटकीसरशी सोडवत नसे, आणि दुसऱ्या कोणाशी गप्पा मारून अकबराला बिरबलाएवढी मजा येत…

पुढे वाचा

हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो….

पुढे वाचा
Ox and Lion

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती. दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता. ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं.  तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता. तो म्हणाला “आज बरा…

पुढे वाचा

साने गुरुजी

प्रारंभिक जीवन  साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1999 रोजी ब्रिटिश भारतातील बॉम्बे राज्यातील दापोली शहराजवळील पालगड गावात. सदाशिवराव आणि यशोदाबाई साने यांच्या एका ब्राह्मण कुटुंबात (महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात ) झाला . तो त्यांचा तिसरा मुलगा आणि दुसरा मुलगा होता. त्यांचे वडील, सदाशिवराव हे परंपरेने खोत म्हणून ओळखले जाणारे महसूल कलेक्टर होते , त्यांनी सरकारच्या वतीने गावातील पिकांचे मूल्यांकन आणि संकलन केले होते आणि त्यांना त्यांच्या संग्रहातील पंचवीस…

पुढे वाचा
Bhandan

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा

विश्वविक्रमी गुकेश

१८ वर्षीय गुकेशने बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्याच्या यशाचे गमक सांगणारा लेख- कॅनडातील टोरॅन्टो येथे झालेल्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय दोमाराजू गुकेश याने अजिंक्यपद जिंकून सगळीकडे एकच खळबळ उडवून दिली. त्याने चक्क जगज्जेत्याला आव्हान द्यायचे? माजी जगज्जेता आणि आजचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने गुकेशचे अभिनंदन करताना मार्मिक टिपणी केली. तो म्हणाला की, गुकेश वयाने एवढा लहान…

पुढे वाचा
t5xryns

अकबराचा वाढदिवस

अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता.  अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्याचा दबदबा फार मोठा होता. दूरदूरच्या राजांकडून यानिमित्ताने शुभेच्छा संदेश येत होते. त्यासोबतच त्या राजांचे दूत अकबरासमोर विविध नजराणे सादर करत होते. त्यात भरजरी कपडे, सुवर्णमुद्रा, सुंदर रत्ने आणि अलंकार इत्यादींचा…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या…

पुढे वाचा
Ekiche bal

एकीचे बळ

एका माणसाला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात बिलकुल पटत नसे. ते सतत एकमेकांशी छोट्यामोठ्या कारणांवरून भांडत राहायचे. कधी कधी मारामारीही करायचे. त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते, पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. त्या माणसाचे मोठे शेत होते.  तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा. पण तिथेही ते कोणी कोणतं काम करावं,…

पुढे वाचा