सावकार आणि शहाणा मुलगा

एका लहानशा गावात एक सावकार राहत होता. त्याचे नाव भाऊजी होतं. भाऊजी पैशांचा व्यवसाय करत असे. तो गरीब लोकांना पैसे देत असे, पण त्याच्याकडून घेतले जाणारे व्याज इतके जास्त असे की लोक कधी कधी त्याच्यावर नाराज व्हायचे. पण पैशांची गरज भासली की कोणालाही पर्याय नसतो, मग त्याच्याकडे जायचंच लागत असे. गावात एक शहाणा मुलगा होता,…

पुढे वाचा

धाडसी सोनू आणि जंगलातील रहस्य

एका खेडेगावात सोनू नावाचा खूप हुशार आणि धाडसी मुलगा राहत होता. तो नेहमी जंगलात फिरायला जायचा. त्याला निसर्ग खूप आवडायचा – पक्षांचे आवाज, वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी, आणि झाडांची सळसळती पाने. एके दिवशी, गावात एक विचित्र अफवा पसरली – “जंगलात एका गुहेत एक जुना खजिना लपलेला आहे!” काहींनी सांगितलं की तिथे एक अदृश्य रक्षक आहे, जो…

पुढे वाचा

“स्वतःची ओळख”

एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते, जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात, प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात, जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याचदरम्यान आकाशात उंच उडणारी घार सुध्दा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते, पण त्याचवेळी घाईत…

पुढे वाचा

– सौ. कविता ताईंची यशोगाथा

“स्वयंपाकघरातून सुरू झाले डिजिटल यश…” नाशिकजवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सौ. कविता देशमुख या गृहिणीला नेहमीच स्वयंपाकाची आवड होती. रोज नवनवीन पदार्थ बनवणं, मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवणं हेच तिचं जग. पण एक प्रश्न कायम सतावत होता – “हे सगळं करून आपण स्वतःसाठी काय कमावतोय?” 2020 च्या लॉकडाऊनमध्ये तिच्या मुलाने तिला YouTube वर स्वयंपाकाचे व्हिडीओ…

पुढे वाचा

शेतकरी मुलाचा डिजिटल यशाचा प्रवास

“नेट नसताना सुरू झाला ऑनलाइन व्यवसाय…” साताऱ्याजवळच्या एका लहानशा गावात राहणारा विवेक जगदाळे हा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण. वडिलांच्या शेतीमध्ये मदत करणं, गुरं ढोर सांभाळणं, हाच त्याचा रोजचा दिनक्रम. शिक्षण बारावीपर्यंत झालं, पण नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी घरची परिस्थिती परवडत नव्हती. एक दिवस गावात एक युवक स्मार्टफोन घेऊन आला. त्याने सांगितलं की तो मोबाईलवरून…

पुढे वाचा

“अती तेथे माती”

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात हरिदास नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती आणि हुशार होता. त्याचं शेतही छान होतं, उत्पन्नही बऱ्यापैकी मिळत होतं. त्याच्या घरात काहीच कमी नव्हतं – शेती, गुरं, धान्य, आणि समाधान. पण एकच दोष होता – हरिदास खूपच लोभी होता. त्याला नेहमी वाटायचं, “थोडी आणखी जमीन मिळाली असती, तर मी…

पुढे वाचा

सोमवारची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी शिव-पार्वती फिरता-फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला, असं पार्वतीनं गुरवाला विचारलं, तेव्हा त्यानं शंकराचं नाव सांगितलं. त्यामुळे पार्वतीला राग आला व ‘तू कोडी होशील,’ असा शाप दिला. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी, त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या….

पुढे वाचा

हरवलेली हसण्याची नदी

एका खूप सुंदर गावातून एक नदी वाहायची. ही नदी साधी नव्हती, तर ती हसण्याची नदी होती. या नदीचे पाणी पिऊन लोक खूप आनंदी व्हायचे आणि नेहमी हसायचे. नदीचा खळखळाट म्हणजे जणू हजारो मुलांच्या हसण्याचा आवाज. गावात ‘नंदा’ नावाची एक छोटी, उत्साही मुलगी होती. तिला नदीजवळ खेळायला खूप आवडायचं आणि तिचे हसू नदीच्या पाण्यासारखं खळखळणारं होतं….

पुढे वाचा

बोलकं ढग आणि शेतकऱ्याचं स्वप्न

एकदा एका कोरड्या प्रदेशात, जिथे पाऊस कधीच पडत नव्हता, तिथे एक गरीब शेतकरी राहायचा. त्याचं नाव होतं शांताराम. शांतारामला शेती करायची खूप इच्छा होती, पण पाणी नसल्यामुळे त्याची जमीन नेहमी ओसाड राहायची. तो रोज आकाशाकडे पाहायचा आणि ढगांना विनवणी करायचा. एक दिवस, आकाशात एक लहानसा, करडा ढग तरंगत होता. तो ढग इतर ढगांसारखा नव्हता; त्याला…

पुढे वाचा

घोडा आणि गोगलगाय

एक होता घोडा, तो खूप घमंडी होता. त्याला एक गोगलगाय दिसली.तिला हळू हळू चालताना बघून घोड्याला तिला चिडवायची हुक्की आली. “अगं गोगलगायी। चल शर्यत लावायची का?” त्याने विचारले.गोगलगायीला घोड्‌याचा राग आला. “बरं, चालेल. रविवारी शर्यल लावूा” ती म्हणाली.गोगलगाय घरी गेली. आणि तिने इतर सर्व गोगलगायींना एकत्र जमवले. त्यांना शर्यतीब‌द्दल सांगितले. सर्वानी मिळून घोड्‌याला अ‌द्दल घडवायची…

पुढे वाचा