कोल्ह्याची फजिती

एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो.” मांजर म्हणाली. कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.” “तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले. “अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला,…

पुढे वाचा

संत ज्ञानेश्वर आणि चांगदेवाचा अहंकार

चांगदेव हे एक सिद्ध योगी होते. त्यांनी १४०० वर्षे कठोर तपश्चर्या केली होती आणि विविध सिद्धी प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्यांना आपल्याला ज्ञानाची गरज नाही, असे वाटत असे. त्यांच्या अहंकारामुळे ते इतर साधू-संतांवर प्रभाव टाकत आणि स्वतःला श्रेष्ठ मानत. एका वेळी, चांगदेवांना संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची कीर्ती कानी पडली. ज्ञानेश्वर अत्यंत कमी वयात आध्यात्मिक…

पुढे वाचा

बेडूक आणि बैल

फार जुनी गोष्ट आहे. एका जंगलात एक तलाव होते, या तलावात बरेच बेडूक राहायचे .त्या मध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलां समवेत राहतं होता. ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे. त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती.तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता. त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे .त्यांना…

पुढे वाचा

कावळा चिमणीची गोष्ट 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही.  एक दिवस काय झालं आकाशात…

पुढे वाचा

अहंकारी राजाला धडा 

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक…

पुढे वाचा

श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच…

पुढे वाचा

बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड

१६६० साली शिवाजी महाराज पन्हाळगडावर मोगलांच्या वेढ्यात अडकले होते. महाराजांना सुरक्षित पळवून नेण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पावनखिंडीत मोगल सैन्याला रोखून धरण्याची जबाबदारी घेतली. शिवाजी महाराजांनी अंधारात पन्हाळगड सोडला आणि विशाळगडाकडे निघाले. मोगल सैन्याने पाठलाग केला, पण पावनखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या ३०० मावळ्यांसह त्यांना अडवलं. मोगल सैन्य खूप मोठं होतं, पण बाजीप्रभूंनी आपल्या तलवारीच्या…

पुढे वाचा

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच…

पुढे वाचा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा

कपटी साप आणि लाकुडतोड्या

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता.  थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले. लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले…

पुढे वाचा