जिजाबाई शहाजी भोसले

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ – १७ जून , इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[२] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. इतिहास जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते….

पुढे वाचा

हसायचं कशासाठी?

शाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली. अशी काय जादू असते हसण्यात?  मनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या…

पुढे वाचा

लहानसा मोरू आणि त्याची हुशारी

एका गावात मोरू नावाचा एक लहानसा मुलगा राहत होता. तो अतिशय हुशार आणि चपळ होता. मोरूला नवीन गोष्टी शिकायची खूप आवड होती. तो नेहमी आपल्या आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकायचा आणि त्यातून काहीतरी शिकायचा. मोरूची गोष्ट एकदा गावात मोठ्या जंगलाजवळून एक व्यापारी जात होता. त्याच्याकडे खूप साऱ्या वस्तू होत्या, ज्या तो बाजारात विकायला नेत होता. तो रस्त्याने…

पुढे वाचा

श्रीकृष्ण जन्माची कथा

ही कथा आहे द्वापारयुगातील. त्यावेळी भोजवंशी राजा उग्रसेन मथुरामध्ये राज्य करत होता. पण त्या राजाचा मुलगा कंस हा फारच आततायी आणि वाईट होता. त्याने आपल्या वडिलांची सत्ता हिस्कावून घेतली. राजा कंसची एक बहीण होती देवकी, जिचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदाराशी झाला होता. एके दिवशी कंस आपल्या बहिणीला सोडण्यासाठी सासरी जात होता. त्याचवेळी एक आकाशवाणी…

पुढे वाचा

प्रेरणा: यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणेचा महत्त्वाचा वाटा असतो. प्रेरणा हीच ती शक्ती आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे, कारण तीच आपल्याला कठीण प्रसंगातही पुढे जाण्याची ताकद देते. प्रेरणेसाठी आदर्श कसे ठरवावे? प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आदर्श असावा. तो आदर्श आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि आपले विचार सकारात्मक ठेवतो. महात्मा गांधींची अहिंसेची शिकवण,…

पुढे वाचा

साधं, स्वच्छ माणूसपण

गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. ‘महात्मा’ म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, ‘इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला…

पुढे वाचा

खेळांचे महत्त्व: निरोगी जीवनासाठी एक पाऊल

खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शालेय जीवनापासून ते व्यावसायिक स्तरापर्यंत खेळांचे महत्त्व प्रत्येक टप्प्यावर वाढत जाते. शरीरस्वास्थ्य, मानसिक तंदुरुस्ती, आणि जीवनातील शिस्त या सर्वांसाठी खेळ उपयुक्त ठरतात. खेळांचे शारीरिक फायदे खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमित शारीरिक क्रियाकलापामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात, लवचिकता वाढते, आणि सहनशक्ती विकसित होते. विशेषतः क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी यांसारखे संघात्मक…

पुढे वाचा

पर्वत आणि उंदीर

एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. ‘श्रेष्ठ कोण?’ यावर ते भांडत होते. पर्वत म्हणाला, “तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस.” उंदीर पटकन म्हणाला, “मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!” पर्वत म्हणाला, “मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी…

पुढे वाचा

मोहीम फत्ते!

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….

पुढे वाचा

त्या होत्या म्हणून…

‘वयम्’ मित्रांनो, एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती! या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या…

पुढे वाचा