Nag Panchami

नागपंचमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या. सर्वांत धाकटीला माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती जरा नाराज झाली. पण मनात म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे. नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल. तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेषभगवानास तिची दया आली. ब्राह्मणाचा…

पुढे वाचा
Murti Vahnare Gadhava

मूर्ती वाहणारे गाढव

एकदा एक मूर्तिकार त्याने बनवलेली देवाची मूर्ती त्याच्या गाढवावर लादुन चालला होता. मूर्ती अतिशय सुंदर होती. रस्त्याने जाता जाता लोकांना मूर्तीचे दर्शन होऊन आनंद होत होता. मूर्तिकाराच्या अप्रतिम शिल्पाचे कौतुक करत आणि देवाकडे पाहुन भावुक होत लोक नतमस्तक होत होते. सगळे आदराने वाकुन नमस्कार करत होते. एवढे कौतुक आणि आदर पाहुन गाढवाला आनंद झाला. त्याला वाटले आज इतक्या दिवसांनी लोकांना त्याचे…

पुढे वाचा
Kombda & Moti

कोंबडा आणि मोती

एक कोंबडा इतर कोंबड्यांसोबत खुराड्यात दाणे टिपत होता. दाणे टिपता टिपता त्याला एक सुंदर मोती सापडला. कोंबडा तो मोती निरखुन बघु लागला. मोती खुप छान दिसत होता. कोंबडा मोत्याला म्हणाला “तु तर फार किंमती रत्न दिसतोस. पण तरीही तुझा मला काहीही उपयोग नाही. तुझ्यापेक्षा एखादा दाणाच माझ्या जास्त कामाचा आहे.” असे म्हणुन कोंबड्याने त्या मोत्याला सोडुन पुन्हा दाणे टिपायला…

पुढे वाचा
Kolha & Makad

कोल्हा आणि माकड

एका जंगलात एका सिहांचे राज्य होते. एका दिवशी तो सिह मेला.  त्याच्यानंतर राजा कोणी व्हावे हे ठरवण्यासाठी प्राण्याची सभा भरली. माकड आणि कोल्हा निवडणुकीला उभे राहिले. दोघांचे भाषण झाले. माकडाने कोल्ह्यापेक्षा खुप छान भाषण केले . सगळ्याचे मनोरंजन करून सगळयांना प्रभावित केले. प्राण्यानी एक मताने माकडाला निवडून दिले. माकड राजा झालेला बघुन कोल्ह्याचा जळफळाट झाला. कोल्ह्यने माकडाला धडा शिकवण्यचे ठरवले.   कोल्हा…

पुढे वाचा
Ox and Lion

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती. दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता. ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं.  तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता. तो म्हणाला “आज बरा…

पुढे वाचा
Lion

सिंहाच्या वेशात गाढव

एकदा एका गाढवाला सिंहाची कातडी सापडली. गाढवाने ती पांघरली आणि थाटात फिरू लागलं. इतर प्राणी त्याला सिंह समजुन तो दिसता क्षणी घाबरून दूर पळु लागले. गाढवाला मजा यायला लागली. आजवर कोणीही त्याला घाबरून पळालं नव्हतं. गाढव जंगलात सगळीकडे फिरून प्राण्यांना घाबरवु लागलं. फिरता फिरता गाढवाला एका कोपऱ्यात एक कोल्हा दिसला. गाढव त्याला घाबरवायला त्याच्या जवळ जाऊ लागलं. कोल्ह्याने सावध पवित्रा घेतला आणि सिंहाच्या…

पुढे वाचा
Lokmany Tilak

शेंगांची टरफले ( लोकमान्य बाळ गंगाधर टिळक )

लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेतली हि प्रसिद्ध गोष्ट आहे. एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या होत्या. त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटुन खाल्ल्या. टिळकांनी एकही शेंग खाल्ली नव्हती. ह्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. शेंगा काढल्या कि त्यांनी टरफले वाट्टेल तिथे टाकल्या. बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफले पडली.  मधली सुट्टी संपल्यावर…

पुढे वाचा
Lokmany Bal Gangadhar Tilak

एकाच शब्दाची विविध रूपे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लहानपणी शाळेत असताना त्यांच्या गुरुजींनी एकदा त्यांना एक गृहपाठ दिला होता. गृहपाठात एक निबंध लिहायचा होता. निबंधाचा विषय संतांशी निगडित होता.  टिळकांनी निबंध लिहुन शाळेत नेला. तो गुरुजींनी तपासला आणि काही ठिकाणी खुणा केल्या. निबंधात संत हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने लिहिला होता. संत, सन्त, सन् त अशा तीन पद्धतीने हा एकच शब्द लिहिला…

पुढे वाचा
Mangalagaur

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही” असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला…

पुढे वाचा
Ved

रेड्याच्या मुखी वेद

आळंदीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी प्रायश्चित करण्यासाठी आपला जीव दिला.त्यांच्या मुलांना त्यांची आपली मुंज व्हावी आणि समाजाने आपल्याला स्वीकारावे ही इच्छा माहीत होती, त्यासाठीच त्यांनी जीव दिला होता.त्यांनी आळंदीच्या ब्राह्मणांना पुन्हा आमची मुंज लावुन द्या अशी विनंती केली.आता आळंदीच्या लोकांकडे काही उत्तर नव्हते. विठ्ठलपंत बैठकीतले म्हणणे एवढे गांभीर्याने घेऊन जीव देतील असे त्यांना वाटले…

पुढे वाचा