ललितापंचमीची कहाणी(The story of Lalitapanchami)

आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता.  त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं.  पुढं ती मुलं जाता-जाता एका नगरात आली. दोन प्रहराची वेळ झाली. चालून-चालून ते दमून गेले. भुकेने व्याकुळ झाले.  त्याच वेळी एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाला त्यांची दया आली. त्याने त्यांना घरी…

पुढे वाचा

महालक्ष्मीची कहाणी(The story of Mahalakshmi)

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी.  त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला.  एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले. त्याच नगरात…

पुढे वाचा
Ganpati

श्री गणपतीची कहाणी

निर्मळ मळे, उदकांचे तळे, वेल वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे-रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यायचा? श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चवथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करून त्यांतील सहा देवाला, सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे. अल्पदान, महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे. त्यास…

पुढे वाचा
Maha Lakshmi

महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा…

पुढे वाचा
vishnu

श्रीविष्णूची कहाणी

काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला….

पुढे वाचा
Nag Panchami

नागपंचमीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच-सहा सुना होत्या. श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी, कोणी पणजोळी; तर कोणी माहेरी गेल्या. सर्वांत धाकटीला माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती जरा नाराज झाली. पण मनात म्हणाली, माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे. नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल. तिच्या मनातील तो दृढभाव पाहून शेषभगवानास तिची दया आली. ब्राह्मणाचा…

पुढे वाचा
Mangalagaur

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही” असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला…

पुढे वाचा