रघु शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबडीला हाका मारायला सुरुवात केली असता ती कोंबडी पळून जाऊ लागली.
रघु शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक उंदराला पाळला होता. तो त्या कोंबडीला म्हणाला, ‘अरे वेडी, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू अशी पळून का जातेस ? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.’
यावर ती कोंबडी म्हणाली, ‘अरे उंदीर मामा, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.’
तात्पर्य : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही.