
निष्पापांचे प्रायश्चित्त
विठ्ठलपंतांची मुले मोठी होत होती. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे आणि ज्ञानेश्वर आठ वर्षांचे झाले होते.ह्या वयात ब्राह्मण मुलांच्या मुंजी करण्याची रीत असते. विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईनी त्यांच्या मुलांसकट आजवर फार अपमान सहन केला होता. नदीवर, रस्त्यात पदोपदी त्यांचा अपमान होत असे, चेष्टा होत असे. संन्याशाची बायको, संन्याशाची पोरे म्हणून हेटाळणी होत असे. आता आपल्या मुलांच्या मुंजी करून त्यांना रीतसर…