चल रे भोपळ्या टुणुक टुणुक 

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’. पण म्हातारी हुषार होती.   ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते…

पुढे वाचा

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

एका जंगलात  एका वडाच्या झाडावर बरीच माकडे राहात असत.  एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता.  थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला.  गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती…

पुढे वाचा

ससा आणि सिंह ची गोष्ट

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्याना ठार मारू नकोस, अशी विनंती केली. माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा. म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला….

पुढे वाचा

तानाजी मालुसरे आणि सिंहगडाचा लढा

तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि निष्ठावंत शूरवीर होते. कोंढाणा ( आताचा सिंहगड) हा किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे काम तानाजींवर सोपवले. १६७० साली मोगल सैन्याच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला (सिंहगड) परत मिळवणे शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. कोंढाण्याला परत मिळवल्याशिवाय पुणे आणि आसपासचा प्रदेश स्वराज्याच्या नियंत्रणाखाली येणे शक्य…

पुढे वाचा

सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु

एका जंगलात तिथला राजा सिंह म्हातारा झाला होता.  त्याचा सेवक कोल्हा त्याला मदत करत असे.  एकदा सिंहली आजाराने ग्रासले. त्याला शिकार करणेही फार अवघड झाले.  कोणी तरी त्याला सांगितले कि गाढवाचा मेंदू खाल्ला तर त्याला बरे वाटेल.  त्याने कोल्ह्याला एखाद्या गाढवाला आपल्याकडे घेऊन यायला सांगितले.  कोल्हा गाढवाच्या शोधात निघाला आणि त्याला एक गाढव सापडले.  त्याने…

पुढे वाचा

संत सावता माळी

संत सावता माळी हे संत ज्ञानेश्वरांच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्ती परंपरेतले एक महान संत होते. परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटीत, एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या देवाधर्माला, अध्यात्माला, भक्ती परंपरेने सर्व चौकटी मोडत घराघरात पोहचवले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातींमधले अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले, आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातुन…

पुढे वाचा

उंदराची टोपी

एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.  आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी…

पुढे वाचा

बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली.  मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून…

पुढे वाचा

कोरड्या विहिरीला पाणी

महाराजांना तहान लागली होती.त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला.त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. “बाबा रे, फार तहान लागली आहे. पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल.”शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणुन घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत (म्हणजे एकही कपडा न घालता) फिरत असत.महाराजांकडे पाहुन…

पुढे वाचा