प्रामाणिक रघूची भेट

एक होता रघू. तो एका लहानशा खेडेगावात आपल्या आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे वडील शेतकरी होते आणि रघूला लहानपणापासून मेहनतीची व प्रामाणिकपणाची शिकवण मिळाली होती. तो रोज शाळेत जायचा, अभ्यास करायचा, आईला घरकामात मदत करायचा, आणि वडिलांसोबत शेतातही जात असे. रघूचा स्वभाव फारच सरळ आणि सच्चा होता. त्याला खोटं बोलायला अजिबात आवडत नसे. मित्रांमध्येही तो नेहमी इमानेइतबारे…

पुढे वाचा

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच…

पुढे वाचा
Geetarahasya

गीतारहस्य

टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलं हि गोष्ट सर्वांनाच माहित आहे. आज जाणुन घेऊ हे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं. टिळकांचे वडील विद्वान पंडित होते. स्वतः टिळकांचा संस्कृत आणि धर्मग्रंथाचा फार गाढा अभ्यास होता. त्यांच्यावर महाभारत आणि भगवदगीता यांचा फार प्रभाव होता. ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर विचार करून तर्क मांडणं याची त्यांना आवड होती. टिळकांच्या वेळेस…

पुढे वाचा

शस्त्रपूजेची गोष्ट

शकुनीमामा आणि दुर्योधनाच्या कटात पांडव अडकले. जुगारात सगळं हरून बसले. युधिष्ठिराने स्वतःचं राज्य, स्वतःचे भाऊ, स्वतः, आणि बायको द्रौपदी सर्वांना पणाला लावुन सर्वांना कौरवांचा दास बनवले. दुर्योधन आणि दुःशासनाने भर सभेत द्रौपदीचा अपमान केला तेव्हा मोठा पेचप्रसंग उभा राहिला. तेव्हा पांडवांनी १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात रहावे असा तोडगा निघाला. पांडवांनी द्रौपदीच्या सोबतीने…

पुढे वाचा
Ox and Lion

दोन बैल आणि सिंह

एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते. त्यांच्यात छान मैत्री होती. दोघे जवळपास नेहमीच सोबत असत. एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता. ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं.  तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता. तो म्हणाला “आज बरा…

पुढे वाचा
Aambe

स्वस्तातले आंबे

लाल बहादूर शास्त्री लहान असताना एक दिवस ते आणि त्यांचा मामा फिरायला गेले होते. फिरून परत होता होता दिवस मावळायला आला. परतीच्या वाटेवर त्यांना एक आंबे विकणारा म्हातारा माणुस भेटला. संध्याकाळ झाल्यामुळे तो आपलं सामान आवरून घरी निघत होता. त्या दोघांना आंबे पाहुन ते खाण्याची इच्छा झाली. त्यांनी आंब्याच्या दराची चौकशी केली. म्हातारा म्हणाला “पोरांनो, आता संध्याकाळ झालीये. बाजार संपला त्यामुळे…

पुढे वाचा

गाढवाला मिळाली शिक्षा 

एका गावात व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळलेले गाढव होते. तो गाढवाच्या पाठीवर रोज मिठाचे ओझे देत असे आणि ते पोत मग बाजारात जाऊन विकत असे. त्या बाजारात जाताना त्यांना एक ओडा पार करावा लागत असे. एक दिवस गाडवाचा पाय पाण्यात घसरतो आणि ते पाण्यात मिठाच्या ओझ्यासहित पडते. त्याचा मालक उठविण्यास मदत करतो आणि मग…

पुढे वाचा

सिंह, कोल्हा आणि गाढवाचा मेंदु

एका जंगलात तिथला राजा सिंह म्हातारा झाला होता.  त्याचा सेवक कोल्हा त्याला मदत करत असे.  एकदा सिंहली आजाराने ग्रासले. त्याला शिकार करणेही फार अवघड झाले.  कोणी तरी त्याला सांगितले कि गाढवाचा मेंदू खाल्ला तर त्याला बरे वाटेल.  त्याने कोल्ह्याला एखाद्या गाढवाला आपल्याकडे घेऊन यायला सांगितले.  कोल्हा गाढवाच्या शोधात निघाला आणि त्याला एक गाढव सापडले.  त्याने…

पुढे वाचा
Shetkari

शेतकरी आणि त्याची मुलं

एका गावात एक शेतकरी राहत होता. तो म्हातारा झाला होता आणि मरायला टेकला होता. त्याला आपल्या मुलांची काळजी होती कारण ते फार आळशी होते. मरण्याआधी त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावले. त्यांना सांगितले कि “पोरांनो आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे. त्यामुळे आपलं शेत अजिबात विकु नका.”मुलांनी हे समजल्यावर शेतात खोदकाम सुरु केले.  शेतात नेमकं कुठे खजिना आहे हे…

पुढे वाचा
Mangalagaur

मंगळागौर

आटपाट नगर होतं. नगरात एक वाणी राहत होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्याच्या घरी रोज एक गोसावी भिक्षा मागण्याकरता येत असे. पण भिक्षा घालायला वाण्याची बायको समोर गेलो कि “मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही” असे म्हणुन निघुन जात असे. वाण्याची बायको दुःखी होत असे. तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला. नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला…

पुढे वाचा