sasa ani kasav

ससा आणि कासव

ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. ससा  सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं. दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,”किती रे…

पुढे वाचा

सिंधुताई सपकाळ: अनाथांची माय

सिंधुताई सपकाळ या एक महान समाजसेविका होत्या, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ, निराधार, आणि वंचित मुलांसाठी समर्पित केले. त्यांचे जीवन हे प्रेरणा देणारे असून, त्यांचा संघर्ष आणि समाजकार्य आपल्याला सहानुभूती, सेवाभाव, आणि धैर्य शिकवते. त्या एक समर्पित समाजसुधारक, कार्यकर्त्या आणि स्त्रीसशक्तिकरणाच्या क्षेत्रातल्या मार्गदर्शक होत्या. त्यांनी बालकांच्या शिक्षणासाठी, अशा स्थितीत असलेल्या महिलांसाठी आणि अनाथांसाठी कार्य केले…

पुढे वाचा

पोपटाचे ध्यान

अकबराच्या महालाच्या आजूबाजूला सुंदर बाग होती. बागेत सुंदर वृक्ष,हिरवळ, फुलझाडे यांनी बहार आणली होती. माळ्यांचा ताफा बागेची निगराणी करण्यासाठी सज्ज असे. बागेत अकबराने काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाळले होते. त्या बागेत प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवणे हा बादशहाचा आणि त्याच्या शाही परिवाराचा आवडता विरंगुळा होता. एकदा बादशहाला एका दूरदेशीच्या राजाने एक रंगीबिरंगी पोपट नजराणा…

पुढे वाचा

कल्पना चावला – खऱ्या जीवनातील प्रेरणादायी कथा..🚀

१९६२ साली हरियाणातील करनाल या छोट्याशा गावात एका मुलीचा जन्म झाला. नाव ठेवलं – कल्पना. लहानपणापासूनच ती आकाशाकडे बघत बसायची. तिला विमानं, तारे आणि चांद्रमा यांचं वेडच होतं. गावातील लोक म्हणायचे – “मुलगी असून एवढी मोठी स्वप्नं?” पण कल्पना हसून उत्तर द्यायची – “एक दिवस मी नक्की आकाशात जाईन.” शिक्षणात ती हुशार होती. करनालमधील शाळा…

पुढे वाचा
raja

निळा कोल्हा – (Nila kolha)

एका घनदाट जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. तो कोल्हा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्रे त्याचा पाठलाग करीत होते. जीवाच्या आकांताने धावणारा कोल्हा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या जाधवांचे होते. त्या जाधवाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी…

पुढे वाचा
kalidas

कविकुलगुरू कालिदास

भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे…

पुढे वाचा

कोरड्या विहिरीला पाणी

महाराजांना तहान लागली होती.त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला.त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. “बाबा रे, फार तहान लागली आहे. पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल.”शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणुन घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते. शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत (म्हणजे एकही कपडा न घालता) फिरत असत.महाराजांकडे पाहुन…

पुढे वाचा
raaya

राया आणि चणा

एका राजवाड्यात, राया नावा छोटीशी राजकुमारी राहत होती. तिला खूप लाड मिळायचे. एके दिवशी, राजा आणि राणी रायाला सहलीवर घेऊन गेले. वाटेत त्यांना एक शेतकरी दिसला. तो शेतकरी जमिनीवर काहीतरी पेरणी करत होता. रायाने विचारले, “काय पेरताय हे ?” शेतकऱ्याने हसून सांगितले, “हे चणा आहे राजकुमारी. यापासून मस्त वेगवेगळे पदार्थ बनतात.” रायाला खूप कुतुहल झाले….

पुढे वाचा

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच…

पुढे वाचा
abcd

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले.  दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले.  एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले.  तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती.  अचानक…

पुढे वाचा