Lion And Rabbit

मूर्ख सिंह आणि हुशार ससा

एकदा एक लोभी सिंह होता. हा सिंह प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत होता. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी सिंहाला खूप घाबरत होता. एके दिवशी, त्यांनी ठरवले की प्रत्येक प्राणी दररोज सिंहाकडे, त्याची शिकार म्हणून जाईल. सिंहाने ते मान्य केले. जेव्हा सशाची पाळी आली तेव्हा त्यांनी शहाण्या सश्याला पाठवायचे ठरवले. तो हळूहळू प्रवास करत सूर्यास्तापूर्वी सिंहाच्या…

पुढे वाचा
mungi Ani Kabutar

कबुतर आणि मुंगी 

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली. पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो…

पुढे वाचा

गाय आणि सिंह

एका हिरव्यागार कुरणात तीन गाई रहात होत्या. काळी, पांढरी आणि भुरी अशी त्यांची नावे होती. त्यांच्या रंणावरून त्यांना ही जावे पडली होती. त्या एकमेकींशी खूप प्रेमाने वागायच्या व कायम एकत्रच रहायच्या. एके दिवशी एक महाभयंकर सिंह त्यांना खाण्यासाठी तिथे आला. परंतु त्या तिघी एकत्र रहात होत्या म्हणून तो त्यांना काहीच करू शकला नाही. सिंहाने विचार…

पुढे वाचा

साप आणि काटा

एका दाट जंगलात एक साप राहत होता. तो स्वभावाने थोडा रागीट होता. कोणी जवळ आलं की लगेच फुसफुसायचा, फणा काढायचा आणि लोकांना घाबरवायचा. त्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्याला टाळायचे. एके दिवशी सकाळी साप झाडाखाली उन्हात लोळत होता. तेवढ्यात त्याच्या शरीरात एक तीव्र काटा रुतला. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण काही वेळात त्याला खूप वेदना व्हायला…

पुढे वाचा

खोडकर मेंढपाळ

एका खेड्यात एक छोटा मेंढपाळ राहत होता. त्याला मजा करायला खूप आवडायचे. एके दिवशी त्याला गावकऱ्यांना फसवायची कल्पना सुचली. तो ओरडला, “सिंह आला! सिंह आला! माझ्या मेंढ्या खाण्यासाठी आला आहे!” गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी धावत आले. पण त्यांनी पाहिले की तिथे सिंह नव्हता. मेंढपाळ मोठ्याने हसत म्हणाला, “मी फक्त मजा करत होतो!” गावकऱ्यांना…

पुढे वाचा
kolha

सिंह, लांडगा आणि कोल्हा

जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते. लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला…

पुढे वाचा

सरखेल कान्होजी: समुद्राचा अजिंक्य राजा

सतराव्या शतकाच्या अखेरीस, भारताची पश्चिम किनारपट्टी परकीय सत्तांच्या लालसेचे केंद्र बनली होती. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच व्यापारी कंपन्या केवळ व्यापारासाठी नव्हे, तर समुद्रावर आणि जमिनीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होत्या. समुद्रावर त्यांचीच हुकूमत चालायची. अशा काळात, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला एक मराठा योद्धा समुद्राचा राजा म्हणून उदयास आला, ज्याने युरोपीय सत्तांना सलग चाळीस…

पुढे वाचा

सरदार वल्लभभाई पटेल – लोहपुरुषाची गाथा

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद गावात झाला. त्यांचे वडील झवेरभाई पटेल हे एक साधे शेतकरी होते, पण त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. आई लाडबाई धार्मिक व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या. वल्लभभाई लहानपणापासून पराक्रमी, प्रामाणिक आणि आत्मनिर्भर होते. त्यांनी आपले शिक्षण स्वतःच्या कष्टाने पूर्ण केलं. ते गरिबी असूनही…

पुढे वाचा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते हे बोधवाक्य आहे भारत सरकारचे! चलनी नोटांवरही आपण हे बोधवाक्य  पाहतो. आपल्या पासपोर्टवर, रेशनकार्डावर, आधारकार्डावरही राष्ट्रमुद्रेखाली तुम्ही हे वाक्य पाहिले असेल. ‘सत्यमेव जयते’ यात सत्यम् + एव हा संधी आहे आणि जयते हे क्रियापद आहे. याचा अर्थ आहे “सत्याचाच विजय होतो – Truth alone triumphs.”  भारत सरकारची जी राजमुद्रा आहे, त्यात उत्तर प्रदेशातील…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या…

पुढे वाचा