एका गावात सुरेश आणि रमेश नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक सुरेश त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो रमेशकडे मदतीसाठी येतो. रमेश खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता, सुरेशला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
रमेशच्या मदतीमुळे सुरेशला फार आनंद होतो. तो रमेशला वचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर रमेश गरीब बनतो. त्याला सुरेशची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने सुरेशकडे जातो. परंतु सुरेश त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
रमेशला खूप वाईट वाटत. सुरेश खूप बदललेला असतो. रमेशच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा रमेशला आणि सुरेशला बोलावतो. राजा सुरेशला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच सुरेशला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता रमेश बरोबर वाटून घ्यावी रमेशला योग्य तो न्याय मिळतो. रमेशने सुरेशला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच सुरेश रमेशला देतो. आता खरा न्याय होतो.
तात्पर्य – खरा न्याय करावा.