हुशार शेतकरी

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता. त्याच्याकडे शेळी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होती. शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई. वाघ शेळी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेळी खाईल याची त्याला भीती वाटते. एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो. मध्ये गेल्यावरती तो शेळी साठी एक गवताची पेंडी तयार करतो. व खूप पाऊस चालू होतो. त्याला घरी येता वेळेस नदी पार करून यावे लागत.नदीला खूप पूर आला होता. शेतकरी शेळी वाघ व गवताची पिंडी घेऊन नदीकिनारी येतो. काही सुचत नाही की आता नदी कशी पार करावी.काय करावे असे तो विचारात पडतो तो मदत होईल का ते पाहू लागतो.किनारी त्याला एक नाव दिसते तो त्या नावे जवळ जातो. एका वेळेस दोन जणांना घेऊन जाईल या अवस्थेत होती. शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण यांना नदीकिनारी कसे घेऊन जावे. शेतकरी विचार करतो की आपण जर पहिल्यांदा गवताची पेंडी घेऊन गेलो तर वाघ शेळीला खाऊन टाकेल व वाघाला घेऊन गेलो शेळी गवत खाऊन टाकेल.तो विचार करतो आणि नाव मध्ये शेळीला घेऊन दुसऱ्या टोकाला सोडून येतो. वाघाला घेतो आणि दुसऱ्या टोकावर ती सोडून येतो आता तो आधी आपल्यासोबत परत या टोकावर घेऊन येतो व गवताला घेऊन जातोपरत तो वापस येतो व शेळीला घेऊन जातो. अशी करून तो नदी सुखरूप पार करतो.

तात्पर्य : विचार करून काम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *