एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते. परंतु कुंभार गरीब असल्यामुळे गाढवाला पुरेसे खायला देऊ शकत नसे.
एक दिवस कुंभार जंगलातून जात असताना त्याला एक वाघ उपाशी झोपलेला दिसतो. कुंभार त्याचा जवळ जातो, पाहतो तर तो वाघ मेलेला असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो दिवसभर वाघाचे कातडे काडतो आणि घरी घेऊन येतो. रात्री कुंभार वाघाचे कातडे गाढवाच्या पाठीवर टाकतो आणि गाढवाच्या कानात सांगतो, जा आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक रात्रभर खा.ते तुला वाघ समजतील. ते तुला घाबरून पकडायला येणार नाहीत. तुला पकडण्याचे धैर्य त्यांना होणार नाही. अशा प्रकारे दररोज रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतात पिक खात असे. एका रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक खाण्यात मग्न होते. त्याच वेळी त्याने गाढवीणीच्या ओरडण्याचा आवाज ऎकला.लगेचच तो देखील किंचाळून प्रतिसाद देऊ लागला. सर्व शेतकऱ्यांना खरा प्रकार समजला. ते शेतकरी गाढवाला चोप देतात. आपण जे नाही ते दाखवायला गेल्यामुळे गाढवाने मार खाल्ला.