एकदा अकबर राजाची एक अंगठी हरवली.ही अंगठी त्याच्यासाठी खूप मौल्यवान होती.
कारण ती त्याच्या वडिलांनी दिलेली भेट होती.ती अंगठी गमावल्याने राजा खूप दुःखी झाला.
अकबराने बिरबलाला बोलावून अंगठी शोधण्याची विनंती केली.
राजाचा दरबार खचाखच भरला होता.
बिरबलाने घोषणा केली, “महाराज, अंगठी इथेच आहे आणि ज्याच्याकडे अंगठी आहे त्याच्या दाढीत गवताची काडी आहे.
सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले आणि दरबारातील एकाने काडी शोधण्यासाठी स्वतःच्या दाढीला हात लावला.
बिरबलाने रक्षकांना बोलावून संशयिताचा शोध घेण्यास सांगितले.
संशयिताची झडती घेतली असता अंगठी मिळाली.
बिरबलला अंगठी कशी सापडली हे पाहून अकबर आश्चर्यचकित झाला.
बिरबल म्हणाला, “महाराज, जो दोषी असेल त्याला नेहमीच भीती वाटते.”
बोध:- चोराच्या मनात चांदणे