Geetarahasya

गीतारहस्य

टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य लिहिलं हि गोष्ट सर्वांनाच माहित आहे. आज जाणुन घेऊ हे गीता रहस्य त्यांनी का लिहिलं. टिळकांचे वडील विद्वान पंडित होते. स्वतः टिळकांचा संस्कृत आणि धर्मग्रंथाचा फार गाढा अभ्यास होता. त्यांच्यावर महाभारत आणि भगवदगीता यांचा फार प्रभाव होता. ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर विचार करून तर्क मांडणं याची त्यांना आवड होती. टिळकांच्या वेळेस…

पुढे वाचा
Sant

दोन संतांची तीर्थयात्रा

ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपूरातून तीर्थयात्रा सुरु केली. भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेटी देणे सुरु केले. काही ठिकाणी ह्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत….

पुढे वाचा
Udnari bhint

उडणारी भिंत

नेवाश्यात ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर काही दिवसांनी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करत आळंदीत पोहोचले. आळंदीतुन नेहमी अपमान सहन करून, वाळीत टाकलेले आयुष्य जगून ते बाहेर पडले होते. आता परत आले तेव्हा मात्र परिस्थिती बदलली होती. त्यांचं आता उत्साहात स्वागत झालं. ज्ञानेश्वरांच्या काळात एक चांगदेव नावाचे योगी होते. हे योगी चक्क चौदाशे वर्षांचे होते. लहानपणापासुन तपसाधना…

पुढे वाचा
kalidas

कविकुलगुरू कालिदास

भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे…

पुढे वाचा
Shivrajyabhishek Sohala

शिवराज्याभिषेकसोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या विरुद्ध…

पुढे वाचा
Vatpronima

वटपौर्णिमा

एके काळी मद्र देशात एक राजा होता. त्याचे नाव अश्वपती. मालविका त्याची राणी होती. राजा राणीला अनेक वर्षे मुल होत नव्हते. त्यामुळे त्यांनी सूर्यदेवाची आराधना केली. सुर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने राजा राणीला अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि गुणवान मुलगी झाली. सूर्यदेवाचे एक नाव आहे सावित्र. सूर्यदेवाच्या कृपेने झालेल्या या कन्येचे नाव तिच्या आई वडिलांनी सूर्याच्याच…

पुढे वाचा
Guru Purnima

गुरुपौर्णिमा

आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणुन साजरे केले जाते. आपल्या संस्कृतीत गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला जे काही मिळतं त्याबद्दल कृतज्ञ असावं हा आपल्याला सतत दिली जाणारी शिकवण आहे. त्यामुळेच दिवसा प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, रात्री प्रकाश आणि शीतलता देणारा चंद्र, पाणी देणाऱ्या नद्या आणि समुद्र, राहायला जागा देणारी भूमी अशा अनेक गोष्टींना…

पुढे वाचा
Ganpati

श्री गणपतीची कहाणी

निर्मळ मळे, उदकांचे तळे, वेल वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे-रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यायचा? श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चवथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करून त्यांतील सहा देवाला, सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे. अल्पदान, महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे. त्यास…

पुढे वाचा
Maha Lakshmi

महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा…

पुढे वाचा
vishnu

श्रीविष्णूची कहाणी

काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड. तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो. असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला….

पुढे वाचा