
मोहीम फत्ते!
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते….