एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते.तो त्या संस्कारांना धरून वागत होता .तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला. घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्या साठी गेला . मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्या समोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते.त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहात बसला होता .ब-याच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असताणही तो त्यांना खात नाही.त्या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते तरी त्याने त्यांना हात लावला नाही.
शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला .शेजाऱ्यांनी त्याला विचारले,”तुला सफरचंद आवडतात ना, मग तरी तू एक ही सफरचंद का खाल्ले नाहीस” मुलगा म्हणाला,” इथेच कोणीच नव्हते, मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते,मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वत:ला पाहात होतो.म्हणून मी खले नाही मी स्वत:ला फसवू शकत नाही.शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला.तो म्हणाला,”आपला आत्मा आपण काय करतो ते पाहात असतो, आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोलयाचे फार अवघड आहे.
तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात . मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांच्या संस्कारचा दोष येतो.