फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात, खूप गोंधळ असतो. लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांचे ऐकत नसतात. कोणाचा कोणावर विश्वास नसतो. देशात चोरांचे प्रमाण वाढते. राजापण या सगळ्या गोष्टी मध्ये सहभागी असतो.त्याचे त्याच्या प्रजेकडे लक्षच नसते. स्वर्गातून देव हे सगळ पाहत असतो. देवाला ते सगळ पाहून खूप वाईट वाटत. मग देव ठरवतो या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा म्हणून देव एका जंगल प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अक्राळ-विक्राळ कुत्रा घेऊन जातो.
कुत्रा लोकांच्या अंगावर जोरजोरात भुंकत असतो, भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात. लोकांच्या ओरडण्याचा आवज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर, एक भयंकर कुत्रा त्याच्या मालकाबरोबर उभा असतो.तो माणूस राजाला म्हणतो, ‘माझा कुत्रा भुकेलेला आहे आणि ज्या लोकांनी पाप केले आहे त्यांना तो खाऊन टाकणार आहे. ‘राजा घाबरतो. गयावया करू लागतो. राजा आणि देशातील सर्व लोक त्यंची माफी मागू लागतात. जंगलाचा राखणदार त्याच्या खऱ्या रुपात म्हणजेच देव रुपात येतो. सर्वजण देवाची क्षमा मागतात. आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात.