एकदा एक लोभी सिंह होता. हा सिंह प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत होता. त्यामुळे जंगलातील प्रत्येक प्राणी सिंहाला खूप घाबरत होता. एके दिवशी, त्यांनी ठरवले की प्रत्येक प्राणी दररोज सिंहाकडे, त्याची शिकार म्हणून जाईल. सिंहाने ते मान्य केले. जेव्हा सशाची पाळी आली तेव्हा त्यांनी शहाण्या सश्याला पाठवायचे ठरवले. तो हळूहळू प्रवास करत सूर्यास्तापूर्वी सिंहाच्या गुहेत पोहोचला. सिंहाने रागाने त्याला विचारले, “तुला एवढा उशीर का झाला?” सश्याने उत्तर दिले, ”सशांचा एक गट तुमच्याकडे येत होता, पण त्यांच्या वाटेतच दुसऱ्या एका भयंकर सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला. मी पळून जाण्यात यशस्वी झालो आणि इथे आलो.” दुसरा सिंह आव्हान देत असल्याचेही सशाने सांगितले.
सिंह अत्यंत संतापला आणि त्याने सशाला नवीन सिंहाला भेटायला घेऊन जाण्यास सांगितले. शहाणा ससा सिंहाला एका खोल विहिरीत घेऊन गेला आणि त्याला त्याचे स्वतःचे प्रतिबिंब दाखवले. सिंहाने डरकाळी फोडली, त्याच्या प्रतिबिंबाने सुद्धा तसेच केले. या प्रतिबिंबाला तो आपला शत्रू मानत असे. चिडलेल्या सिंहाने दुसऱ्या सिंहावर हल्ला करण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे, शहाण्या वृद्ध सशाने स्वतःला आणि जंगलातील सर्व प्राण्यांना वाचवले.
बोध: नेहमी समस्यांऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.