सोनेरी हरणाचा त्याग

हरणांचा राजा वट हरीण अत्यंत सुंदर आणि सोनेरी होता. तो बनारस जवळील घनदाट जंगलांमध्ये राहायचा. तो आपल्या बुद्धिमत्ता आणि नेतृत्वासाठी खूप प्रसिद्ध होता. त्या जंगलात अजून एक सोनेरी हरीण राहत होता. त्याला सर्वजण शाखा हरीण म्हणायचे. दोन्ही हरणे आपापल्या कळपाचे प्रमुख होते. कळपांमध्ये जवळपास पाचशे हरणे सलोख्याने राहत होती.

तिथे राज्य करीत असलेल्या राजाला शिकार करण्याचा छंद होता. राजाला भोजनामध्ये हरणांचे मांस खूप आवडायचे. राजा अनेकदा हरणाची शिकार करायला जायचा आणि सगळ्या गावकऱ्यांना आपापली कामे सोडून राजाची मदत करायला लागायची. जोपर्यंत राजा एखाद्या हरणाची शिकार करत नाही, तोपर्यंत गावकऱ्यांना त्याच्या सोबतच राहावे लागायचे.

यामुळे व्यथित होऊन गावकऱ्यांनी एक हरणांची बाग बनवली. त्या बागेत जंगलातील सगळ्या हरणांना ठेवण्यात आले. जेव्हा राजा शिकार करायला जायचा, तेव्हा तो हरणांच्या बागेत जाऊन शिकार करायचा. त्याला गावकऱ्यांच्या मदतीची गरज पडत नव्हती, परंतु या सगळ्यात हरणांना आपला जीव वाचवण्यासाठी त्या बागेतून बाहेर जाता येत नव्हते.

वट आणि शाखा हरणांनी आपापल्या कळपातील हरणांची एकत्रित सभा बोलावली. वट हरीण म्हणाला, “मित्रांनो! आपण कठीण संकटाचा मुकाबला करत आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन यामधून मार्ग काढायला हवा.”

शाखा हरीण म्हणाला, “तू बरोबर बोलत आहेस. आपण एकत्रितपणे काहीतरी मार्ग काढू.”

वट हरणाने एक उपाय सुचवला, “आपण दररोज राजासाठी एक हरीण पाठवू, एकदा तुझ्या कळपातील हरीण जाईल आणि नंतर माझ्या कळपातील एक हरीण जाईल. हे सर्वांना मान्य आहे का?”

सर्व हरणांनी सहमती दर्शवली. अशाप्रकारे राजासाठी दोन्ही कळपांमधून दररोज एक एक हरीण जाऊ लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *