पूतना वध – कृष्णाची पहिली राक्षसीवध लीला

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला पण त्याला वाचवण्यासाठी वासुदेवांनी त्याला गोकुळात नंद-यशोदा यांच्या घरी आणलं.
कंसाला हे समजल्यावर त्याने विविध राक्षस आणि राक्षसींना कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवलं. त्यातील पहिली होती – पूतना.

पूतना ही एक राक्षसी होती जिने अनेक लहान बाळांना विषारी दुधाने मारले होते. ती वेगवेगळ्या गावांमध्ये स्त्री रूप धारण करून जात असे आणि बाळांना छातीला लावून विषप्रद दूध पाजून त्यांचा वध करत असे.

एके दिवशी पूतना सुंदर स्त्रीचे रूप घेऊन गोकुळात आली. तिचा चेहरा मोहक होता, आणि अंगावर दैवी वस्त्र होती. गावातील लोकांना ती कोण आहे हे कळलेच नाही.
ती यशोदा माईंना नम्रतेने म्हणाली, “तुमचं बाळ खूप गोंडस आहे. मी त्याला क्षणभर मांडीवर घेऊ का?”

यशोदा माईंनी विश्वासाने बाळ श्रीकृष्णाला पूतनाच्या हातात दिलं. पूतनाच्या स्तनात विष होतं, आणि ती कृष्णाला दूध पाजू लागली.

पण कृष्ण तर सर्वशक्तिमान होते! त्यांनी पूतनाच्या विषारी दुधाचा त्रास न होता, तिचा जीवच शोषून घेतला.
ती वेदनेने किंचाळू लागली, आणि खरं रूपात — एक भयानक राक्षसी बनली. तिचा आकार एवढा मोठा झाला की तिचं पडलं शरीर संपूर्ण गोकुळापलीकडे गेले!

गावकऱ्यांनी पाहिलं तर लहानसा कृष्ण तिच्या छातीजवळ खेळत होता, एकदम शांत आणि हसरा!

गोकुळवासीय भयभीत झाले, पण यशोदा माईंनी आपल्या बाळाला हळूवार उचललं. त्याला काहीही झालं नव्हतं. सर्वांनी हे ईश्वरी चमत्कार मानलं.

तात्पर्य
आपल्यावर संकट आले तरी विश्वास, भक्ती आणि ईश्वराची कृपा असेल तर ते संकट आपोआप नष्ट होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *