गोकुळामध्ये कृष्णाच्या खोड्यांमुळे संपूर्ण गाव हलवून जात असे. तो रोज काही ना काही नवीन शरारत करत असे — कधी गायींच्या शेपटी ओढायचा, कधी गवळणींच्या माठावर दगड मारून माखन सांडायचा, तर कधी घरातले लोणी चोरून आपल्या मित्रांसोबत झाडावर बसून खायचा. यशोदा माई त्याला आईसारखं प्रेम करत असे, पण त्याच्या खोड्यांमुळे ती कधी कधी रागावत असे. एके दिवशी अशीच एक घटना घडली.त्या दिवशी सकाळी यशोदा माई अंगणात दूध तापवत होती. कान्हा घरात एकटाच होता. त्यानं चुपचाप जाऊन माखन ठेवलेली हंडी उघडली आणि आपल्या लहानशा हातांनी माखन खाऊ लागला.

तेवढ्यात भांडे पडून फुटलं, आणि माखन सांडल यशोदा धावत आत आली आणि तिला कळलं की कृष्णाने पुन्हा एकदा लोणी चोरी केली आहे. यशोदेचा संताप अनावर झाला. तिनं कान्हाला धरलं आणि रागाच्या भरात त्याला एक जाड उखळ (ओखळ) – ज्याचा वापर धान्य कुटण्यासाठी केला जातो – त्याला दोरीने बांधून टाकलं. कान्हा रडला नाही. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही मिश्कील हसू होतं. यशोदा काही कामासाठी बाहेर गेल्यावर कृष्ण त्या उखळासह रांगायला लागला!कृष्ण खेळत खेळत एका बागेत गेला. तिथं दोन मोठ्या अर्जुन वृक्षा एकमेकांना खूप जवळ उभ्या होत्या. कृष्ण त्या झाडांमधून उखळ ओढत जात असताना, उखळ झाडांमध्ये अडकले. कान्हा जोरात ओढू लागला आणि… अचानक दोन्ही झाडं पडली! जोरात आवाज झाला आणि धुळीचा ढग उडाला!
तिथं उपस्थित गोकुळवासी घाबरून गेले. पण झाडांमधून दोन तेजस्वी दिव्य पुरुष बाहेर आले. ते होते नलकूबर आणि मणिग्रीव, धनसंपत्तीचे देवता कुबेराचे पुत्र. हे दोन बंधू पूर्वी गर्वाने भरलेले होते आणि त्यांनी ऋषी नारदांची अवहेलना केली होती. नारदांनी त्यांना “वृक्ष” होण्याचा शाप दिला होता. परंतु नारदांनी भविष्यवाणी केली होती की श्रीकृष्ण त्यांना आपल्या स्पर्शाने मुक्त करतील. आज त्या दिवसाची पूर्तता झाली होती. त्यांनी कृष्णाला वंदन केलं, त्याचं स्तुतीगीत गायलं आणि आकाशमार्गे स्वर्गात परतले.यशोदा माईने हे सगळं पाहिलं. तिला जाणवलं की आपलं बाळ साधा मुलगा नाही. पण तरीही तिच्या हृदयात एकच भावना होती — आईचं प्रेम.
कृष्णाने यशोदेच्या प्रेमात स्वतःला इतकं गुंतवलं होतं की, साक्षात परमेश्वर असूनही तो एका मायेच्या दोरीने उखळाला बांधला गेला!
शिकवण: कोणतंही गर्वित मन भक्तीच्या स्पर्शाने मुक्त होऊ शकतं.