दोन भुकेल्या मांजरी होत्या. एके दिवशी त्यांना एक चपातीचा तुकडा मिळाला. दोघी त्या तुकड्यावर आपापला हक्क सांगू लागल्या.
एका मांजरीने तो तुकडा उचलला. दुसरी मांजर म्हणाली, “चल मिळुन वाटून खाऊया.”
पहिली मांजर चतुर होती. तिला एकटीलाच पूर्ण चपाती खायची होती. तिने दुसऱ्या मांजरीला साफ नकार दिला. दोघींमध्ये भांडण झाले.
त्याच वेळी तिथून एक माकड जात होते. दोन्ही मांजरीने त्याला विनंती केली, “दादा, तुम्हीच आमचा निकाल द्या. आम्हाला चपातीचा तुकडा सापडला आहे. मी म्हणत आहे की, मिळून वाटून खाऊ, पण तिला चपाती एकटीलाच खायची आहे.”
माकड म्हणाले, “जर तुम्ही दोघी सोबत होत्या तर मग चपातीवर कोणा एकीचा हक्क कसा असू शकतो. याची जर समान वाटणी झालीच पाहिजे. हाच न्याय आहे. आणा, ती चपाती माझ्याकडे. मी त्याचे समान तुकडे करतो आणि एक एक तुकडा तुम्हा दोघींना देतो.”
माकडाने चपातीचे दोन तुकडे केले. मान हलवत म्हणाला, “दोन्ही तुकडे समान नाहीत. हा तुकडा दुसऱ्या तुकड्या पेक्षा मोठा आहे.” त्याने मोठ्या तुकड्यातून एक घास खाल्ला. तरीसुद्धा दोन्ही तुकडे एकसारखे झाले नाही.
माकडाने परत मोठ्या तुकड्या मधून थोडा घास खाल्ला. माकड अशा प्रकारे मोठ्या तुकड्यातून थोडे थोडे घास खात राहिला.
शेवटी चपातीचे दोन छोटे छोटे तुकडेच शिल्लक राहिले.
हे बघून मांजर म्हणाली, “माकड दादा, आमची चपाती आम्हाला परत कर. आम्हाला काही निकाल नाही लावायचं.”
त्यांची गोष्ट ऐकून माकड हसला आणि म्हणाला, “अहो! आता एवढे छोटे छोटे तुकडे मी तुम्हाला कसे देणार? हे तर माझ्या कष्टाचे आहेत.” असे म्हणत माकडाने ते दोन्ही तुकडे पण आपल्या तोंडात टाकत पळ काढला.