एक उंदिरमामा होता. तो रस्त्याने जात असताना याला एका फडके सापडते.ते फडके जरा खराब झाले होते म्हणून उंदीरमामा एका धोब्याकडे जातात.आणि त्या धोब्याला म्हणतात धोबिदादा,धोबीदादा माझे एक काम करा न मला हे फडके धुवून द्या ना .धोबिदादा उंदीरमामाला फडके धुवून देतात.आता उंदीरमामा जातात शिंप्याकडे ‘शिंपीदादा,शिंपीदादामला या फडक्याची एक सुंदर टोपी शिवून द्या कि आणि तिला छानशा रंगीत गोंडा हि लावा.
शिंप्यादादाने उंदिरमामाला गोंड लावून छानशी टोपी बनवून दिली. उंदीरमामा टोपी डोक्यात घालून हातात एक ढोलके घेतले आणि वाजवत माझी टोपी राजाच्या टोपीपेक्षारा छान.ढुम,ढुम,ढुमक ! राजाने हे ऐकले लगेच राजाने शिपायांना म्हणाला ‘जा त्या उदिरला माझ्यासमोर पकडून आणा.
शिपायांनी उंदिरला पकडले आणि राजाकडे आणले राजाने त्याची टोपी काढून घेतली. मग उंदिरमामा म्हणाला माझी टोपी घेतली.’राजा भिकारी,’राजा भिकारी, ढुम,ढुम,ढुमक !’हे ऐकून राजा रागावला त्याने उंदीरमामा ची टोपी खाली फेकली आणि उंदीरमामा ने ती घेतली आणि म्हणाला राजा मला घाबरला. माझी टोपीपरत दिली. ढुम,ढुम,ढुमक !’तो राजवाडयातून निघून गेला.
तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ