माकड आणि मगर

एकदा एका जंगलात, नदीच्या काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होते. त्याच जंगलात एक मगर आणि त्याची बायको राहत होती. एके दिवशी मगर नदीच्या काठावर येऊन झाडाखाली विसावला. दयाळू माकडाने त्याला काही जांभळे दिली. मगर दुसऱ्या दिवशी आणखी जांभळांसाठी परत आला, कारण त्याला जांभळे खूप आवडली होती. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मगर आणि…

पुढे वाचा

तेनालीराम चे वाक्चातुर्य

एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की,…

पुढे वाचा

एक तरी ओवी अनुभवावी ।

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी…

पुढे वाचा

सावित्रीबाई जोतीराव फुले

सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील नायगावचे पाटील होते. तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाईना सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती अशी तीन भावंडे होती. सावित्रीबाई लहानपणापासूनच धाडसी, हुशार आणि निर्भीड होत्या. तसेच त्या खेळात, पोहण्यात, नेमबाजीत देखील तरबेज होत्या. सावित्रीबाईना लहानपणापासून…

पुढे वाचा

सिंह आणि उंदीर

एका घनदाट जंगलात एक शक्तिशाली सिंह राहायचा. त्याची गर्जना ऐकताच सर्व प्राणी घाबरून जायचे. तो जंगलाचा राजा मानला जात असे. त्याच जंगलात एक लहानसा उंदीरही राहायचा. तो खूप छोटा आणि दुबळा होता, म्हणून इतर प्राणी त्याला फारसे महत्त्व देत नसत. एके दिवशी, सिंह जेवणानंतर झोप घेण्यासाठी एका मोठ्या झाडाखाली आराम करत होता. त्याच वेळी, लहान…

पुढे वाचा

गंपूची शाळा

एका गावात गंपू नावाचा एक छोटा मुलगा राहायचा. तो खूप चपळ, चलाख आणि हसतमुख होता. पण त्याला शाळेत जाण्याची अजिबात आवड नव्हती. रोज सकाळी शाळेत जाण्याची वेळ आली की तो बहाणे शोधायचा आणि कधी ताप आल्याचं सांगायचा तर कधी पोट दुखतंय असं. गंपूच्या आईवडिलांना त्याच्या या वागणुकीचं खूपच आश्चर्य वाटायचं. ते त्याला शाळेत का जायचं…

पुढे वाचा