सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद गावात झाला. त्यांचे वडील झवेरभाई पटेल हे एक साधे शेतकरी होते, पण त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. आई लाडबाई धार्मिक व कर्तव्यदक्ष स्त्री होत्या. वल्लभभाई लहानपणापासून पराक्रमी, प्रामाणिक आणि आत्मनिर्भर होते. त्यांनी आपले शिक्षण स्वतःच्या कष्टाने पूर्ण केलं. ते गरिबी असूनही शिक्षणासाठी अथक मेहनत घेत होते. पुस्तकं विकत घेणं शक्य नसल्यानं ते इतरांकडून उधारीवर पुस्तके घेत असत. वल्लभभाई यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन कायदा पदवी घेतली. भारतात परत आल्यावर ते एक यशस्वी वकील झाले.

पण १९१७ मध्ये महात्मा गांधीजींच्या प्रभावी विचारांनी प्रेरित होऊन वल्लभभाईंनी वकिली सोडली आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यांनी काही ऐतिहासिक आंदोलनात ही सहभाग घेतला .
- खेड़ा सत्याग्रह (1918): शेतकऱ्यांवर आलेल्या दुबार कराविरुद्ध त्यांनी गांधीजींसह लढा दिला.
- नागपूर ध्वजसत्याग्रह (1923): त्यांनी ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या राष्ट्रीय ध्वज फडकावण्याच्या अधिकारासाठी आंदोलन केलं.
- बारडोली सत्याग्रह (1928): कर वाढीच्या विरोधात त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. यश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना “सरदार” ही पदवी दिली.
१५ ऑगस्ट १९४७ – भारत स्वतंत्र झाला, पण देशाचे तुकडे नव्हते मिटले…
भारताच्या स्वातंत्र्यवेळी देशात ५६२ स्वतंत्र संस्थानं होती (हैदराबाद, जूनागढ, जम्मू-काश्मीर इ.). ही संस्थाने भारतात सामील होण्यास तयार नव्हती. देशाच्या एकतेसाठी भक्कम आणि दूरदर्शी नेतृत्व आवश्यक होतं.
सरदार पटेलांनी काय केलं ?
त्यांनी संस्थानांच्या राजांशी थेट चर्चा केली. “देशप्रेम राष्ट्राच्या एकतेपेक्षा मोठं काहीही नाही” हे त्यांनी त्यांना पटवून दिलं. काही ठिकाणी लष्करी हस्तक्षेप (उदा. हैदराबाद ऑपरेशन पोलो) केला. केवळ काही महिन्यांत ५६२ संस्थानं भारतात विलीन केली. यामागचं नेतृत्व, निर्णयक्षमता आणि राष्ट्रप्रेम अतुलनीय होतं. ही भारताच्या एकतेची ऐतिहासिक किमया होती. त्यामुळे त्यांना “भारताच्या एकतेचे शिल्पकार” आणि “लोहपुरुष” म्हणून गौरवण्यात आलं.
स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री झाले. भारतीय नागरी सेवा (IAS, IPS) यांची पुनर्रचना केली. त्यांनी दंगली रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतले आणि शांतता प्रस्थापित केली. पोलिस आणि प्रशासन यंत्रणा मजबूत केल्या. लष्कराच्या एकत्रीकरणात मोठं योगदान दिलं.
सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन १५ डिसेंबर १९५० रोजी मुंबई येथे झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त करण्यात आला.
जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांच्या स्मरणार्थ “Statue of Unity” गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात उभारण्यात आला.

- उंची: १८२ मीटर
- हे जगातील सर्वात उंच स्मारक आहे.
- उद्घाटन: ३१ ऑक्टोबर २०१८