(एक शिकवण देणारी गोष्ट)

खूप वर्षांपूर्वी एका सुंदर डोंगराळ गावात एक छोटा मेंढपाळ मुलगा राहत होता. त्याचं काम होतं गावातल्या मेंढ्यांची राखण करणं. दररोज सकाळी तो आपल्या मेंढ्यांना घेऊन डोंगरावर जायचा. तिथं त्यांना चरण्यास सोडून तो एकटाच बसायचा. सुरुवातीला त्याला ते काम खूप मजेदार वाटायचं, पण हळूहळू एकटं बसून त्याला कंटाळा यायला लागला.
एक दिवस त्याच्या डोक्यात एक खोडसाळ कल्पना आली. “थोडं गंमत करूया,” असं म्हणून त्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली: “लांडगा आला रे आला! वाचवा रे, लांडगा आला!” गावातले लोक भीतीने धावत डोंगराकडे आले. काहींनी हातात लाठ्या घेतल्या, काहींनी दगड. सगळेच चिंता व्यक्त करत म्हणाले, “कुठे आहे लांडगा? कुठे गेला?”
मुलगा मात्र जोरजोरात हसत म्हणाला, “हा हा! मी फक्त गंमत केली! खरं तर लांडगाच नाहीये!” गावकरी चिडले आणि म्हणाले, “खोटं बोलणं चांगलं नाही. आम्ही घाबरलो म्हणून धावलो आलो, आणि तू आमचं थट्टा केलीस!” काही दिवसांनी त्याने पुन्हा तेच केलं – “लांडगा आला रे आला!”
गावकरी पुन्हा धावले… आणि पुन्हा फसवले गेले. त्यावेळी ते खूपच रागावले. एकाने तर सांगून टाकलं, “आता जर पुन्हा असंच केलंस, तर कोणीही येणार नाही.”

परंतु… एक दिवस खरंच एक रानलांडगा डोंगरावर आला. मेंढ्यांवर हल्ला करू लागला. मुलगा खूप घाबरला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली:
पण गावातल्या कुणालाही त्याच्या ओरडण्यावर विश्वास बसला नाही. सगळ्यांनी विचार केलाः
“तो मुलगा तर खोटं बोलतो. पुन्हा एखादी थट्टा असेल.”
कोणीही डोंगरावर आलं नाही. त्या दिवशी लांडग्याने अनेक मेंढ्यांना मारलं, आणि त्या मुलाचं खूप नुकसान झालं. त्याला समजलं की खोटं बोलल्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.
शिकवण :
सतत खोटं बोलणाऱ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.”
“खोटं बोलल्यास माणूस स्वतःचं नुकसान करतो.”
“थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.”