उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावला खूप तहानलेला होता. त्याचा घसा कोरडा पडला होता. ज्या जंगलात तो राहायचा, तिथले सगळे नदी, तलाव उन्हाळ्यामध्ये सुकून गेले होते. एवढ्या उन्हात उडून लांब जाणे पण कठीण होते. तहान लागल्यामुळे तो व्याकुल झाला होता.
शेवटी न रहावुन तो पाण्याच्या शोधात उडू लागला. तो जंगलातून शहराच्या दिशेने गेला. तिथे एका घरावरून उडताना त्याला एका झाडाच्या खाली एक माठ ठेवलेले दिसला. तो माठावर जाऊन बसला. त्याने माठामध्ये वाकून बघितले त्याच्यात थोडेसे पाणी होते. त्याची चोच प्रयत्न करून सुद्धा पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. तो विचार करू लागला की आता काय करू?
तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. तो जमिनीवरून एक-एक दगडू उचलून माठात टाकू लागला हळू-हळू माठातले पाणी वर येऊ लागले. काही वेळाने पाणी वरती आले आणि आता त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचली.
कावल्याने पोट भरून पाणी प्याले आणि आनंदाने काव-काव करीत उडून गेला.