
ललितापंचमीची कहाणी(The story of Lalitapanchami)
आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं. पुढं ती मुलं जाता-जाता एका नगरात आली. दोन प्रहराची वेळ झाली. चालून-चालून ते दमून गेले. भुकेने व्याकुळ झाले. त्याच वेळी एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाला त्यांची दया आली. त्याने त्यांना घरी…