
संकष्टी चतुर्थीची कहाणी
पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते; पण त्याच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दान-धर्म केला; पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही. राजा-राणी उदास झाले. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले….