janhavi

बकरी ईद

बकरी ईद या मुस्लिम सणाची पार्श्वभुमी इब्राहिम / अब्राहमशी निगडित आहे. जुडाईसम (ज्यु लोकांचा धर्म), ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म या धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणतात. कारण अब्राहम हा या तिन्ही धर्मांमध्ये पुजला जाणारा आद्यपुरुष आहे.ज्यु आणि ख्रिश्चन धर्मीय त्याला अब्राहम म्हणतात आणि मुस्लिम लोक त्यालाच इब्राहिम म्हणतात. मुस्लिम धर्मीय येशु ख्रिस्तापर्यंत होऊन गेलेल्या प्रभावी व्यक्तींना…

पुढे वाचा

निवृत्ती ते निवृत्तीनाथ

विठ्ठलपंत संन्यास घेऊन पुन्हा संसारात आले होते हे गावकऱ्यांना मान्य नव्हते. त्यांना ते पाखंडी, अधर्मी समजत. त्यामुळे त्यांना मुले झाली तेव्हा त्या मुलांची संन्याश्यांची पोरे म्हणुन गावात फार हेटाळणी होत असे. निंदानालस्ती होत असे.आपलं आयुष्य तर खडतर गेलंच पण आपल्या मुलांच्या वाट्याला अशी अवहेलना बघुन विठ्ठलपंत आणि रखुमाई फार दुःखी झाले. आपल्या मुलांना घेऊन ते…

पुढे वाचा

आषाढी कार्तिकी एकादशी

हिंदु धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात. एकादशी म्हणजे अकरावा दिवस. हा दिवस भगवान विष्णु यांच्या पूजेचा असतो. त्यादिवशी उपवास, सदाचरण, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. हिंदु कालगणनेत चंद्राच्या कलांनुसार दिवस मोजतात. म्हणजे चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस, आणि मग कमी होत अमावास्येपर्यंतचे १५ दिवस. त्यामुळे एका…

पुढे वाचा

कुत्र्याचे प्रतिबिंब

एक कुत्रा होता.  त्याला एकदा एक मांसाचा तुकडा मिळाला. तो तुकडा घेऊन तो नदी किनाऱ्याने जात होता.  त्याला नदीत आपले प्रतिबिंब दिसले. त्याला तो दुसरा कुत्रा वाटला, आणि त्याच्या तोंडातला मांसाचा तुकडा आपल्यापेक्षा भारी आहे असे वाटले.  त्याने त्या पाण्यातल्या कुत्र्याशी भांडायला म्हणुन भुंकायला सुरुवात केली.  भुंकायला तोंड उघडताच त्याच्या तोंडातील मांस नदीत पडले आणि वाहुन…

पुढे वाचा

शिवराज्याभिषेक सोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या…

पुढे वाचा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या अठराव्या शतकातील एक महान राज्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म ३१-मे-१७२५ रोजी महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या जामखेडजवळील चोंडी गावात झाला. त्याकाळात मुलींना शिकवण्याची रीत नव्हती. परंतु अहिल्याबाईंच्या वडिलांनी मात्र त्यांना लिहायला वाचायला शिकवले होते. त्यांना लहानपणापासुन देवाधर्माची आवड होती. एकदा त्या आठ वर्षाच्या असताना मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी गेलेल्या होत्या. गावातुन मराठा साम्राज्याचे मातब्बर…

पुढे वाचा

कोल्ह्याला द्राक्षे आंबट

एका कोल्ह्याला भुक लागली होती. तेव्हा अन्न शोधत फिरत असताना त्याला एक द्राक्षाचा वेल दिसला.द्राक्षांचे बहारदार घड त्या वेलीला लटकलेले पाहुन कोळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो त्या वेलीखाली गेला आणि द्राक्षे खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो वेल कोल्ह्याच्या मानाने बराच उंच होता. त्याला बऱ्याच उड्या मारूनही द्राक्षे काढता आली नाहीत. शेवटी निराश होऊन कोल्हा…

पुढे वाचा

सिंड्रेला

एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. म्हणुन तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला दोन सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या दोन बहिणींचेच नेहमी लाड करायची, आणि सिंड्रेलाला मात्र खुप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची साफसफाई, कपडे धुणे, भांडे घासणे असे घरातले…

पुढे वाचा

हिरकणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून तो प्रदेश जिंकुन घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला. आधी रायरी असे नाव होते, पण बांधुन झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड. म्हणजे राजाचा गड.आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले. ह्या गडावर महाराजांनी विचारपुर्वक अनेक सोयी केल्या होत्या. बाजार बनवला होता. तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या…

पुढे वाचा

गाढव आणि टोळ

एकदा एका गाढवाने टोळाचे गाणे ऐकले. त्याचे गाणे ऐकुन गाढवाला स्वतःलासुद्धा गावे असे वाटायला लागले.त्याने त्याच्या भसाड्या आवाजात सुर आळवणे सुरु करताच बाकी प्राण्यांनी त्याला थांबवले. गाढव निराश झाला.त्याने टोळाला विचारले कि तु इतका छान कसा गातोस? तु काय खातोस ज्याने तुला एवढं छान गाता येतं?टोळ म्हणाला मी फक्त दवबिंदुच पितो. बाकी काही खात नाही….

पुढे वाचा